वाईः सकस, समृध्द व सकारात्मक ताकद वाढवून दैनंदिन जीवनातील प्रत्येक आव्हानाला, संकटाला ध्यैर्याने सामोरे जाण्यासाठी बळ देतात. प्रत्येकाने आपले मन स्वच्छ करण्याचे अभियान राबविल्यास खर्यात अर्थाने देशातील स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल, असे मत समुपदेशक श्रीमती मेधा जेरे यांनी व्यक्त केले.
येथील लो. टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत सकारात्मक जीवनशेली – जगण्याचा रामबाण उपाय, या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. रुपाली अभ्यंकर होत्या.
श्रीमती जेरे म्हणाल्या, संत रामदास यांनी मनाचे श्लोकमधून समाजाला मन म्हणज ेकाय, त्याची शक्ती आणि त्याचा जीवनात कसा उपयोग करून घ्यावा, याची माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे. बहिणाबाईंनीही आपल्या अभंगातून व अनुभवातून मनाची ओळख करून दिली आहे. सकारात्मक विचारातून निर्माण होणार्याख लहरी मनाला बळ देतात. या बळाच्या सामर्थ्यांवरच आदीमानवापासून आजपर्यंत अनेक व्यक्तींनी जीवनातील आव्हाने व प्रतिकूल परिस्थितीत संकटे पार करून यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांनी यातना सहन करून स्वातंत्र्याचा लढा उभ केला. ज्ञानेश्वतर माउलींच्या वाटयाला आलेली अवहेलना त्यांच्या साहित्यकृतीत दिसत नाही. त्यों साहित्य म्हणजे माहिती, ज्ञान, अनुभव व दृष्टिकोन यांचे प्रतीक मानले जाते. अर्जुन पुरस्कारप्राप्त दीपा मलिक, एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणार्याल अरुणिमा सिन्हा यांच्या संघर्षाची कहाणी सांगून त्यांनी मन आणि विचार यांच्यातील संबंध, त्याचा मागोवा व परिणाम, जीवन समृध्द करण्यासाठी सकारात्मक विचाराचा होणारा उपयोग याविषयीचे विवेचन केले. डॉ. रुपाली अभ्यंकर यांनी समारोप केला. लक्ष्मीकांत रांजणे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता कान्हेरे यांनी स्वागत केले. श्रीमती जयश्री गोखले यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाईकर नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
खर्या अर्थाने देशातील स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल: मेघा जेरे
RELATED ARTICLES