वाई : धावडी-पिराचीवाडी येथे असणार्या तलावातील गाळ काढणे आणि खोलीकरण करणे या कामात येथील तरुणांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद, प्रेरणादायी आहे. अशा प्रकारचे काम करणार्या कार्यक्षेत्राच्या तालुक्यातील विविध गावात 2296 तास पोकलॅन, जेसीबी मशिन उपलब्ध करुन दिले आहे. या कामाची दिंडी आता येथील तरुणांच्या सहकार्यासाठी दाखल झाली आहे. अशा स्वरुपाचा पुढाकार प्रत्येक ठिकाणच्या तरुणाईने घेतल्यास त्या त्या गावाचे, परिसराचे चित्र नक्कीच बदलेल, अशा शब्दांत किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी श्रमणार्या हातांचा गौरव केला. धावडी, ता. वाई येथे सुरु असलेल्या तलावाच्या गाळ काढणे आणि खोलीकरण करण्याच्या कामासाठी किसन वीर कारखान्याने पोकलॅन उपलब्ध करुन दिला आहे. त्या कामाची मदन भोसले व संचालकांनी पाहणी केली. धावडी-पिराचीवाडी येथील युवक व ग्रामस्थांकडून सुरु असलेले श्रमदान व गावी पाणीदार करण्यासाठी सुरु असलेली धडपड पाहून आनंद व्यक्त करत भोसले पुढे म्हणाले, या परिसरात पाऊसमान चांगले असूनही खूप जुन्या असलेल्या या तलावात पाणीसाठा होत नव्हता. त्यामुळे या तलावाचा गावाला, परिसराला उपयोग होत नव्हता. या परिस्थितीकडे केवळ तटस्थपणे न पाहता येथील तरुणाईने या तलावातील गाळ काढण्यासाठी खोलीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते, ग्रामस्थांनी पाठबळ दिले. त्यामुळे तरुणाईने हाती घेतलेल्या या कामाला गती मिळण्यात यश आलं. सागर मांढरे म्हणाले, अपुर्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती व पशुधन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मदनदादा भोसले यांनी जातीने लक्ष घालीत केलेल्या मदतीमुळे धावडीसह चार गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यावेळी विलास मांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक रतनसिंह शिंदे, सयाजी पिसाळ, मधुकर शिंदे, प्रताप यादव, माजी संचालक रोहिदास पिसाळ, ज्येष्ठ नेते तथा माजी उपसभापती शंकरराव गाढवे, पंचायत समिती सदस्य दिपक ननावरे, शेखर भोसले-पाटील, नितीन माने, विजय धुमाळ, विवेक मांढरे, विष्णु मांढरे, जिजाबा मांढरे, सचिन मांढरे, राजेश मांढरे, रामदास मांढरे, सदाशिव मांढरे, चंदरराव मांढरे,धोंडीबा मांढरे, प्रमोद मांढरे, अरूण मांढरे, सुर्यकांत मांढरे, प्रशांत मांढरे, स्वप्नील मांढरे, किरण मांढरे, दत्ता मांढरे, अनिल मांढरे, प्रविण मांढरे, यांच्यासह ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.यंदाची सुरुवात चिलेवाडीतून भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी किसन वीर कारखान्याने सन 2016 पासून प्रत्यक्ष पाऊले उचलली. कोणत्या गावात कोणत्या गटाचे, पक्षाचे वर्चस्व हे न पाहता ज्या गावात गावाची श्रमदानासाठी एकजूट झाली आहे त्या गावात किसन वीर कारखान्याचे पोकलॅन, जेसीबी पोहोचतात. यंदाच्या या दुष्काळ निवारण्याच्या कामात योगदान देणार्या दिंडीची सुरुवात कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीपासून झाली. आतापर्यंत विविध गावात 2296 एवढे तास काम झाले असून, यंदाच्या वर्षी विविध 12 गावात 820 तास एवढे काम झाले आहे. पोकलॅन, जेसीबीचे बाजाराभावानुसार असणारे प्रति तास भरभक्कम भाडे पाहता केवळ डिझेलवर किसन वीर कारखान्याकडून उपलब्ध होणारी यंत्रणा या कामाला मोठा हातभार लावणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
स्वप्न पाण्याचे.. मदतीला यंत्रणा किसनवीरची..!
RELATED ARTICLES