सावलीः जी .जी . आण्णांनी तत्वाशी कधीच तडजोड केली . नाही त्यांनी प्रत्येक माणुस नी माणुस जोडण्याचा प्रयत्न केला . त्यांनी पैसा नाही तर माणस कमवली म्हणूनच आज 22 वर्षानंतरही आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रचंड जमलेला जनसमुदाय हीच त्याची पोहोच पावती आहे . मी सुद्धा खासदार म्हणून नाही तर अण्णांचा एक मुलगा म्हणून इथं आलोय .जी जी अण्णांचा स्वभाव सर्वाना बरोबर घेऊन जाणारा होता . त्यांच्या विचारांचा वारसा सुपुत्र अमित पुढे चालवत आहे जनतेने जस आण्णांवर प्रेम,सहकार्य केल तसेच प्रेम आणि सहकार्य अमितला करा व तुमच्या मनातली गोष्ट यशस्वी करून दाखवा असे आवाहन खा .श्री .छ ..उदयनराजे भोसले यांनी केले
जावली तालुक्याचे माजी आमदार जी जी कदम यांच्या बावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमात व धरण ग्रस्तानच्या मेळाव्यात खा .उदयनराजे भोसले बोलत होते .यावेळी पुनर्वसन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष माधव भंडारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील,सातारा जावली विधानसभा शिवसेना क्षेत्रप्रमुख एस एस पार्टे,माथाडींचे नेते ऋषीभाई शिंदे,जनजागरणचे राज्य समन्वयक माधव कुलकर्णी,उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ,जावली बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे,माजी सभापती मोहनराव शिंदे, माजी सभापती मानसिंगराव म2ढेकर, महाबळेश्वर च्या उपसभापती अंजना कदम,एकनाथ ओंबळे,उद्योजक विजयराव शेलार आदी मान्यवर उपस्थित होते
नितीन बानुगडे पाटील म्हणाले जी जी आण्णा लोकमान्य आणि राजमान्य व्यक्तिमत्व होते शिक्षकी पेशाने आण्णांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली म्हणून ते आणि त्यांचे सुपुत्र अमित सुसंस्कृत घडले . तळा गाळातील जनतेसाठी ते शेवटपर्यंत झिजत राहीले. शासनाने तालुक्यात प्रकल्प सुरू केले पण आघाडी सरकारला पंधरा वर्षात ते पूर्ण करता आले नाहीत आता आम्हीच हि धरणं पूर्ण करणार .प्रकल्पग्रस्तानच्या वेदना आम्हाला कळतात म्हणून मी अधिकाऱयांना आदेश दिलेत कि प्रत्येक प्रकल्पग्रस्ताचे समाधान करा .बोन्डारवाडी ग्रामस्थानचा गैरसमज होता तो दूर केला आहे .बोंडारवाडी धरणाचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल . असे आश्वासन दिले.
माधव भंडारी म्हणाले जी जी आण्णांच्या कार्याबद्धल मी ऐकून होतो . पण त्यांच्या कार्यक्षेत्रात येवून त्यांना जवळून जाणून घेण्याचा आज योग आला.आण्णांप्रमाणेच अमितने साधापणा जपला आहे आणि आण्णांचे बध्दल करून घडवलेला कार्यकर्ता अमित आहे म्हणूनच जावलीची जनता आण्णांवर आणि अमितवर प्रेम करते आहे
या भागात धरणं होऊन अनेक वर्षे झाली तरीही धरण ग्रस्तानचे प्रश्न सुटले नाहीत .काय करत होते इथले लोकप्रतिनिधी ? 50 ते 60 वर्ष होवून ही येथील जनता एवढी गप्प का ? आजपर्यंत अन्याय सोसणार्या जनतेचे प्रश्न आता युती शासनच निकाली काढणार आहे. बोन्डारवाडी धरण होईल ते नवीन पुनर्वसन कायद्यानुसार त्यामुळे पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय धरणाच्या कामाला सुरुवात होणार नाही .
यावेळी पांडुरंग जवळ , शांताराम देशमुख, काशिनाथ बैलकर ,फडतरे गुरुजी, योगेश गोळे यांनी ही आपल्या मनोगतातून अण्णांच्या कार्याला उजाळा दिला. सुरुवातीला मान्यवरांनी जी जी आण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. प्रास्ताविक भाषण अमित कदम यांनी केले . त्यामध्ये त्यांनी तालुक्याच्या स्वाभिमाना साठी जे .जे. सामाजिक प्रश्न आहेत ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करु.
आण्णांचा वारसा सांभाळत असताना वेगळ्या भावनेने काम करण्याची प्रतिष्ठानची जबाबदारी आहे.बोंडारवाडी धरणाला मान्यता मिळावी अशी उपस्थीत मान्यवरांकडे त्यांनी आग्रही मागणी केली.
कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुंखे,शिवसेना तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे,विठ्ठलराव फडतरे,बाबासाहेब कदम,बबनआण्णा चव्हाण,सयाजीराव शिंदे,श्रीहरी गोळे,आशिष भिलारे , एकनाथ पवार आदी मान्यवर ,धरणग्रस्त व आण्णांचे बंधू , कुटुंबिय , व त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
जी.जी.आण्णांनी तत्त्वांशी तडजोड केली नाहीः खा. श्री.छ.उदयनराजे भोसले
RELATED ARTICLES