पाटण: – कोअरझोन मधील १४ गावे आणि जवळपास २२ हजार लोकवस्ती असणा-या क्षेत्रातील जनता अनेक वर्षापासून जीव मुठीत घेवून जगत आहे येथील जनतेच्या भवितव्यासाठी सहयाद्री व्य्राघ प्रकल्पातील १४ गावे वगळण्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी राज्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कराड येथील चर्चादम्यान केली असल्याची माहिती माजी मंत्रीविक्रमसिंह पाटणकर यानी पत्रकार परिषद दिली.
राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्याच्या दौ-यावर आले असता त्यांना कराड येथे विश्राम गृहात त्यांची भेट घेवून १४ गावे वगळण्याबाबत शासनस्तरावरील कार्यवाही बाबत चर्चा केली. तसेच या विभागातील जनतेच्या न्याय मागणी बाबत शासन पातळीवरील उदासिनता निदर्षनास आणली. यावेळी वन्यजीवचे एम.के. राव उपस्थित होते.
स्थानिक जनतेचे जीवन उध्दवस्त होवून अनेकांच प्राण गेले आहेत. शेती करणे अडचणीचे झाले आहे. उद्योग व्यवसायावर अनेक निर्बध आले आहेत.त्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत शासनाच्या १९ जानेवारी २०१६ च्या बैठकीमध्ये सहयाद्री व्य्राघ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या बफर झोनची बंधने जाचक अटी व बफर झोन रद्द करण्याबाबत मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाल मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत या प्रश्नी निष्चित काल मर्यादेत कार्यवाही करण्याचे निष्चित करण्यात आले दरम्यान या प्रश्नाबाबत सवौच्च न्यायालयानेे आदेष देवूनही अद्याप १४ गावे वगळण्याची आमंलबजावणी करण्यात आलेली नाही. याकडे माजी मंत्री पाटणकर यांनी लक्ष वेधल्यानंतर या आदेषाचे आवलोकन करून या प्रकरणी १ महिन्यात निर्णय घेवू असे ३ वर्षापूवी सांगिण्यात आले होते. मंत्री महोदयांनीही शासनाकडून राष्ट्रीय वन्य जीव मंडळाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सदर बैठकीमध्ये दिले होते. विभागातील २२००० लोकवस्ती व लगतच्या असणा-या गावांना वन्य विभागाच्या जाचक अटी व निबंधाचा व वन्यपाण्याचा ही त्रास सोसावा लागत आहे. वन्य प्राण्यामुळे होणा-या शेंतीच्या नुकसानीचे निकष शेतक-यांना न्याय देणारे नाही. जनतेच्या न्याय मागणीबाबत अधिकारी मंडळी एकाच ठिकाणी बसून यावर निर्णय का घेत नाहीत .मानसिकता असेल तर सर्व काही होवू शकते. शासनानेे निर्णय घेण्यासाठी टाळा टाळ करणा-या अधिका-यांना योग्य ते आदेष दयावेत. पर्यावरणाची आणि वन्यप्राण्याची काळजी करणा-या शासने याविभागातील १४ गावातील जनतेची काळजी घ्यावी. या गावातील लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष आणि त्यांच्या समोर असणा-या जीवनमरणाचे प्रष्न चर्चे दरम्यान केले. असे पत्रकार परिषदेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सांगितले.