सातारा : तारळी नदीवर चार लिफ़्ट इरिगेशन आहेत. त्यांच्या कामासाठी निधी अपुरा पडू देणार नाही. येत्या सहा महिन्यात या योजना पूर्णत्वात नेल्या जातील. त्यामुळे तारळे परिसरातील पाच हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येईल. तसेच धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही वर्षभरात मार्गी लागतील, असे आश्वासन मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री. छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ तारळे (ता. पाटण) येथे रविवारी प्रचारसभा झाली. त्यात ते बोलत होते. पाटणचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा परिषद सदस्या संगिता खबाले -पाटील, जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव, पंचायत समिती सदस्य विलासराव देशमुख, राजाभाऊ काळे, सुभाष पवार, साता-याचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, प्रकाश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
पाटण तालुका निसर्गरम्य परिसर असल्याने भविष्यात येथे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जातील. त्या माध्यमातून या परिसरात रोजगार वाढिस लागेल व पोटासाठी अन्यत्र जाणारांचे लोंढे थांबतील. या भागाचा विकासासाठी जनतेने निर्धार करावा व राष्र्टवादीलाच निवडणून द्यावे, असे आवाहनही मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
आपण लोकशाहीत वावरतो या व्यवस्थेत दर पाच वर्षानी निवडणूका अटळ असतात. त्यामुळे आपण काळजी पूर्वक मतदान करायला हवे. पाच वर्षांपूर्वी आपण ज्यांच्या ताब्यात देशाची सत्ता दिली त्यांनी मनकी बात करीत खोटी आश्वासने दिली, मोठंमोठ्या गप्पा मारल्या, देशाचे संपूर्ण अर्थकारण बिघडवून टाकले आणि गांधीजींचा विचार मातीमोल केला.
जोपर्यंत आपण पुन्हा सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देत नाही आणि पंचायतराज संकल्पनेतून सत्तेचे विकेंद्रीकरण करत नाही तोपर्यंत खर्या अर्थाने देशाची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत होणार नाही, म्हणून सध्याच्या जुलमी राजवटीला हटविण्यासाठी या निवडणुकीत योग्य विचार करा, असेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
देशातील प्रत्येक घटक भयभीत झाले आहेत, मात्र लोकशाहीतील राजा असलेल्या जनतेला आता 5 वर्षापुर्वी केलेली चूक सुधारण्याची संधी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत थापा मारून त्यांनी लोकांना भुलवले आणि केंद्रात सत्तारूढ झालेल्याना धडा शिकवण्यासाठी डोंगर दर्यातील मतदारांनी आता निर्धार करावा व घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा, असे आवाहनही त्यांनी केले.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, दिल्लीतील सरकारची खोटं बोलायची संकल्पना आहे. मुंबईतील फडणविस सरकारची पण तिच संकल्पना आहे. आपल्या तालुक्यातील संसदपटू आमदारांनी तीच खोटं बोलायची संकल्पना ठेवली. 100-200 कोटींचे नुसते आकडे फेकले जातात. पण तारळी धरणांतर्गत 2 कोटीची कामे करता न आल्याने शिवारात पाणी पोहचले नाही. उद्याच्या निवडणूकीत उदयनराजेंना तारळे भागातील ताकद दाखवून द्यावी. येत्या काळात त्यांच्यामार्फत भागाच्या विकासासाठी जास्तीतजास्त निधी आणू. सदाभाऊ जाधव, अभिजित पाटील यांची भाषणे झाली. शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सातारचे माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, शिवाजीराव खामकर, बाऴासाहेब पाटणकर, बापूसाहेब खबाले, कृष्णाराजे राजेमहाडीक, विलास सपकाळ, बंडा पाटील, अभिजित जाधव, समृद्धी जाधव, सागर राजेमहाडीक व भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सासपडे, नुने येथेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले .
तारळी पाणी योजनांसाठी निधी अपूरा पडू देणार नाही : खा. उदयनराजे
RELATED ARTICLES