मसूर ःसातारा जिल्ह्यातून बारमाही वाहणार्या कृष्णा नदीवरील कराड नजिक असणार्या आशिया खंडातील महत्वाकांक्षी टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे पाणी कराड तालुक्यातील दुष्काळग्रस्त असलेल्या शामगाव व खटाव तालुक्यातील म्हासुर्णे या गावांना उपलब्ध व्हावे यासाठी कराड उत्तरचे आमदार माननीय बाळासाहेब पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरूवार दिनांक 27 जून रोजी पुन्हा एकदा आग्रही मागणी केली.
या दोन्ही गावाच्या शेजारून टेंभू उपसा सिंचन योजनेचा कॅनॉल गेला असून पाण्यासाठी विधानसभेत वारंवार मागणी केली गेली मात्र त्याचे सर्वेक्षण करा असे सांगण्यात आले परंतु सर्वेक्षणाचे काम सुद्धा अपूर्णच आहे. तरी या गावांना टेंभू योजनेचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे व या गावांचा पाणी प्रश्न सोडवावा अशी आग्रही मागणी केली व भविष्यात या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल अशी अपेक्षा आहे.
संबंधीत मंत्री महोदय म्हणाले की, सभागृहामध्ये आ. बाळासाहेब पाटील यांचेकडून आम्हांस निवेदन मिळालेले असून, याबाबत सकारात्मक निर्णय घेवू.
टेंभू योजनेचे पाणी शामगांव व म्हासुर्णे या गांवाना मिळण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांची मागणी
RELATED ARTICLES