मायणी :(सतीश डोंगरे) मायणी वन अरण्याला आज दुपारी अज्ञात लोकांनी लागवलेल्या आगीमुळे वनराईत मोठ्या प्रमाणावर वणवा पेटला,परंतु मायणी येथील पत्रकार व युवकांच्या सतर्कतेमुळे येथील वनराई वाचवण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी मायणी अभयारण्य मध्ये आग लागली,काही कंटकांनी ही आग लावल्याचे सांगितले जात आहे.वाऱ्यामुळे एक बाजूला लागलेल्या आगीने बघता बघता मोठ्या वनव्याचे रूप घेतले,तेथूनच प्रवास करणाऱ्या लोकांनी फक्त पाहण्या पलीकडे काहीच केले नाही परंतु त्याच वेळी त्याठिकाणाहून प्रवास करणारे मायणी येथील पत्रकार दत्ता कोळी व त्यांचे मित्र विजय माळी यांनी कोणताही विचार न करता वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतला, यावेळी मायणी पत्रकार संदीप कुंभार,महेश जाधव,पोलीस पाटील यांनीही वन कर्मचारी मोहन जाधव,मल्हारी जाधव यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी येथून प्रवास करणारे दादासाहेब लोखंडे,अभिजित खाडे यांनीही या कामी मदत केले.व मायणी येथील दुर्ग व वन्यजीव प्रेमी शुभम माळी यांनी दुरवर असलेल्या वनविभाग कार्यालयातून पाणी आणून वानवा विझवला. यामुळे ऐशी टक्क्यांहून अधिक वनराई वनव्यापासून वाचवण्यात या सर्वांना यश आले .याकामासाठी ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.
मायणी अभयारण्य मध्ये सर्वत्र उन्हाच्या तीव्रतेने सुकून गेलेले गवत मोठ्या प्रमाणावर आहे .याठिकाणी येणारे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आग लावत आहेत.यामुळे लागणाऱ्या वणव्यात वनराई बरोबरच सरपटणारे प्राणी,कीटक व अन्य प्राणी बळी पडतात.अश्या वानवा लावणाऱ्या अपप्रवृत्तीवर वेळीच अंकुश लावून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.