परळी :- पावसाळा आला की ग्रामीण भागातील समस्या या नेहमीच वर तोंड काढतात. कुठे रस्ता खचला तर कुठे दरडी पडल्या परंतु सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील केळवली येथील महाकाय दगडाचा प्रश्न गेली तीन वर्ष रेंगाळत आहे यामुळे गावावरची टांगती तलवार कधी गावकऱ्यांचा जीव घेईल हे सांगता येत नाही. गुरुवारी दुपारी तीन वाजता केळवली येथील डोंगरावरील काही दगड गावाच्या दिशेने झेपावत असताना दैव बलवत्तर म्हणून ऐन वेळी दगडाने दिशा बदलल्याने जीवित हानी होण्यापासून बचाव झाला.
सातारा तालुक्यातील केळवली हे गाव तसेच दुर्गम भागातील. मोजकी लोकसंख्या असलेल्या गावात प्रमुख व्यवसाय हा शेती केली जाते. परंतु याच केळवली गावाच्या माथ्यावर असलेल्या डोंगरावरील काही महाकाय दगडांचा धोका हा नेहमीच या गावाला असतो. दरवर्षी कागदी घोडे नाचवले तरी प्रश्न काही सुटत नाही. 2017 पासून येथील ग्रामस्थ हे महाकाय दगड हटवण्याची मागणी करत आहेत. तसेच जर हटवणे शक्य नसल्यास संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी करत आहेत. परंतु या ग्रामस्थांना दरवर्षी आश्वासनच मिळत आहे.
परळी खोऱ्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची उघडझाप ही सुरुवात आहे यामुळे ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास केळवली येथील डोंगरावरील महाकाय दगड गावच्या दिशेने झेपावत होता. परंतु सुदैवाने दगडाने ऐनवेळी दिशा बदलल्याने गावातील जीवित हानी होण्यापासून बचाव झाला परंतु आम्ही किती दिवस असे जीव मुठीत घेऊन जगायचं? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. संबंधित प्रशासन आमचा जीव गेल्यानंतरच उपाय योजने वर भर देणार का? असा सवालही ग्रामस्थ विचारत आहेत.
2017 पासून ग्रामस्थ करत आहेत पाठपुरावा
केळवली येथील ग्रामस्थांवर ईल यांचे संकट गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी सांगून देखील यावर कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत उलट पावसाळा आला हे ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सल्ला देण्यात येतो परंतु गेल्या तीन वर्षांपासून हे दगड हटवण्याचा तसेच संरक्षण भिंत बांधण्याचा कोणताही प्रयत्न न झाल्याने एखाद्याचा जीव गेल्यानंतरच आमचा प्रश्न सोडवणार का असे ग्रामस्थ भावना व्यक्त करत आहेत.