सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीनंतर देशभर आता न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर दस्तुरखुद्द चार न्यायमूर्तींनी चक्क सर्वोच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या वर केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे.यामुळे आता सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार चर्चा सुरू झाली.
न्यायमुर्ती बी एम लोया यांच्या गुढ मृत्यू च्या चौकशीसाठी इतर खंडपीठाकडे न दिल्याने तसेच इतर अनेक कारणांमुळे चार हुषार व निःपक्षपाती न्यायधीश यांनी जनतेच्या न्यायाल्यात पत्रकार परिषद घेऊन आवाज व प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे देशहितासाठी इतर सर्वोच्च न्यायालयातील 23 न्यायाधीशांनी याबाबत अश्याप्रकारे धाडस केले नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही. त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या न्यायालयीन कामकाज करणार्या यंत्रणेला त्याचा चांगलाच धक्का बसला आहे. जेष्ठ वकील डी व्ही पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. यावेळी माजी सरकारी वकील अशोक पाटील शिरगावकर, तुषार भद्रे उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या खटल्याबाबत व कायदा सुव्यवस्था तसेच इतर न्यायाल्यातील कामकाजाबाबत नेमकी माहिती सामान्य माणसाला नसली तरी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्ना बाबत आता सामान्य माणसाच्या मनात विचार प्रक्रिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी आरोपीला अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात अडचण निर्माण झाली की, काही महाभाग हे न्यायालयाची बदली कधी होणार याकडे लक्ष केंद्रित केले जाते. काहीवेळेला सबळ पुरावा सादर केला जात नाही. याचा फायदा घेऊन अनेक जण आपापल्या आरोपातून निर्दोष सुटले आहेत. राज्यातील सरकारी वकील व इतर नियुक्ती ही राजकीय पक्ष यांच्या प्रेरणेने होत असते. असा आरोप करण्यात आला होता. त्याचीही चर्चा रंगू लागली आहे. एकूणच न्यायालयाची पायरी चढताना एकदा तरी विचार करावा लागतो. आता तर न्यायाधीश यांच्या कार्यपद्धतीवर खुलेआम प्रश्न उपस्थित केला आहे. याचे आता सर्वानीच आत्म परीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक खटल्याबाबत आजही उलट सुलट मत व्यक्त केले जात आहे. हा लोकशाही मार्गाने केलेला संघर्ष मानला जात आहे. दरम्यान, याबाबत सविस्तर चर्चा आयोजित करण्यात येणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे अवलोकन करण्याची सातार्यात चर्चा
RELATED ARTICLES