सातारा दि :महाराष्ट्राचे आराध्य दैवत व बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत बेताल वक्तव्य करून अकलेचे तारे तोडणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगत कोशारी व भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांचा आघाडीच्या वतीने जाहिर निषेध करून त्यांच्या प्रतिमेचे दहन व चप्पल मारून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
सुमारे अर्धा तास खटाव तालुक्यातील वडूज बस स्थानकासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राजकीय पक्षाच्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करीत तसेच कोशारी व त्रिवेदी यांचा तिखट शब्दात निषेध करून महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून दिला आहे. घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल म्हणजे लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, लोकशाही मान्य नसणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पाठ्यबळावर राज्यपाल हे अफजलखानालाही लाजवेल अशा पद्धतीने शिवरायांचा अवमान करत आहेत. त्यामुळे सर्वजण त्यांच्या निषेध करत आहेत. खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज सकाळपासूनच विविध गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी वडूज बस स्थानकासमोर वाहतूक थांबवून राज्यपाल व भाजप प्रवक्ते या दोघांच्याही प्रतिमेला जोडो मारून निषेध घोषणा दिल्या. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे अवमान करण्याचे त्यांनी जे धाडस केलेले आहे हे धाडसच त्यांची व त्या राजकीय पक्षाच्या सत्तेची कबर बांधण्यासाठी इतिहासात नोंद घेतली जाईल अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आदरणीय सावरकर यांच्या बद्दल वक्तव्य केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी जी आगपाखड केली. ती योग्यच आहे परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करूनही स्मशान शांतता निर्माण केली आहे यावरून त्यांच्या शिवरायांबद्दलचे प्रेम दिसून येत आहे अशा खोचक शब्दांमध्ये विजयकुमार शिंदे,डॉ महेश गुरव यांनी भावना व्यक्त केल्या.
या वेळी शिवप्रेमी संभाजीराव गोडसे, राजू फडतरे, डॉ संतोष गोडसे, मोहन देशमुख,अक्षय थोरवे,आनंदा साठे,परेश जाधव, प्रतिक बडेकर,इम्रान बागवान, कृणाल गडांकुश, अजित कंठे, पृथ्वीराज गोडसे, विपुल गोडसे, मनोज कुंभार, विजय शेटे, तसेच पंकज राऊत,श्रीकांत काळे, संजय गोडसे, संतोष दुबळे, दत्ता केंगारे, अभय देशमुख, सत्यवान कांबळे,सुनिल गोडसे, सुरेश लंगडे, राम कुलकर्णी, राजू माने,आबा भोसले, सुशांत पार्लेकर, दिलावर मुल्ला, महंमद मुल्ला, लखन पवार,बरकत मुल्ला, हणमंत देवकर, निलेश घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. तरीही वाहन चालकांनी ही या आंदोलनात सहभागी होऊन छत्रपती शिवराय यांच्या बद्दल आदर व्यक्त केला.