Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीजावलीत मुंबई पुण्याहून येणाऱ्या नागरीकांमुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली

जावलीत मुंबई पुण्याहून येणाऱ्या नागरीकांमुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली

मेढा ( वार्ताहर ) कोरोना विषाणुबाबत आत्ता कोठे जावली मुक्त होत असताना मुंबई पुण्याहून गावाकडे येणारे नागरीक यांचेमुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली असून गावस्तरीय दक्षता समितीलाही दक्ष राहून आपले काम करावे लागणार आहे.
संपूर्ण जिल्हा कोरोना विषाणुचा सामना करीत असतानाच जावली तालुका कोरोनाला हद्दपार करण्याच्या तयारीत असताना बाहेरून येणारे परंतू आपलेच नातलग असणारे नागरीक यांबाबत ग्रामस्तरीय दक्षता कमिटी नक्की काय भुमिका घेणार तसेच येणाऱ्या नागरिकांना कशा प्रकारे होमक्वावारंटाईन करणार आहे याची चर्चा सुरू आहे.
जावलीत मुंबई, पुणे तसेच इतर जिल्हयातुन येणारे नागरिक यांची अंदाजे आकडेवारी ग्रहीत धरून ज्या त्या गावांना याबाबतची माहिती पुरवली जाणार असून संबंधित गावांनी ही योग्य ती उपायात्मक योजना करणे बंधनकारक आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरीकांना त्यांचे घरीच होमक्वावारंटाईन करणार की आणखी कोठे याची माहिती दक्षता कमिटीला मिळणे महत्वाचे असून यामुळे वादावादीचे प्रसंग निर्माण होण्याचे प्रमाण वाढेल याचीही भिती व्यक्त होत आहे.
या बाबत संबंधित गावांनी त्यांना होमक्वावारंटाईन करणे कामी प्राथमिक शाळांच्या खोल्या, मंदिरे यांचा उपयोग करणे योग्य ठरणार असून यामुळे त्या नागरीकांना बाहेर ठेवता येईल तसेच गावातुनच जेवणाची सोय करता येणे शक्य आहे अशी चर्चा सुद्धा सुरु आहे. एकंदरीत मुंबई पुणे तसेच इतर पर जिल्ह्यातुन गावी येणाऱ्या नागरीकांमुळे कोरोनाची चिंता वाढू लागली असून वेळेत याबाबत कार्यवाही व्हावी आणि परिसर कोरोनामुक्त रहावा अशी अपेक्षा जावलीकरांकडून व्यक्त होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular