सातारा : पुस्तके, ग्रंथ वाचणे हे आपल्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. कोणतीही निराशा टाळायची असेल तर वाचन हेच त्यावर औषध आहे. जो वाचतो तोच घडतो आपल्या मातृभाषेत असलेल्या ग्रंथांचे वाचन आपणास चांगल्या माणूस घडविण्यासाठी जास्त मोलाचे ठरते. भाव भावना समजण्यासाठी आपली भाषाच महत्वाची सातारा ग्रंथमहोत्सव हा महाराष्ट्रामध्ये सातारा पॅटर्न म्हणून ओळखला जातो असे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
ग्रंथमहोत्सवात नांदेडचे प्रसिध्द गायक संजय जोशी यांचे गित रामायण हा कार्यक्रम ग्रंथमहोत्सव समितीने आयोजित केल्याने सातारकरांना जुन्या रामायणाची प्रचिती आणून दिली. भारतीय संस्कृतीत रामायणाला फार मोठे स्थान आहे. संस्कृतीचा पाया आपल्या भघरतीय साहित्यात आहे. ग. दि. माडगुळकरांनी व सुधीर फडके यांनी रामायण आपल्या काव्यातून आपल्या स्वरातून अजरामर केले. नांदेडचे गायकांनी सातारच्या रसिकाना मंत्रमुग्ध केले. याबद्दल मी धन्यवाद देतो असे म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्व कलाकारांना ग्रंथभेट देवून सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. देशमुख म्हणाले की सातारच्या गादीचा संबंध नांदेडशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे थेट वंशज आम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळाले त्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला या बद्दल आम्ही सर्व कलाकार धन्य झालो.
इंद्रजीत भालेराव यांच्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रस्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. प्रा. साहेबराव होळ यांनी आभार मानले.