परळी :- जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहरातील सीमा बंद करण्यात आले आहेत शहरात येण्यासाठी फक्त कोरेगाव मार्ग व मोळाचा वडा मार्ग सुरू ठेवण्यात आले होते मात्र शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने संपूर्ण शहर लॉक डाऊन आहे. सर्व ईतरत्र मार्ग कडेकोट बंदोबस्तात बंद केले आहे सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेला बोगदा ही बंद केल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना शहरात जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे
गेल्या काही दिवसांपासून सातारा शहराच्या पश्चिम भागाला जोडणारा बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कोणाला जर शहरात यायचे असेल तर शेंद्रे मार्गे हायवे कडून यावे लागत आहे विनाकारण आठ ते दहा किलोमीटरचे अंतर प्रवास हा करावा लागत आहे. आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील वाहतूक बंद असल्याने याना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बोगदा हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी सुरु करावा अशी मागणी करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी तरी सर्व तपासणी करून का होईना पण आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरू करावी अशी मागणी होत आहे.
आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बोगदा खुला करावा ; संबंधित कर्मचाऱ्यांना करावी लागतेय कसरत
RELATED ARTICLES