बावधन : वाई तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. यश सुभाष दाभाडे (वय 13 रा. बावधन), रंगदास शामराव सळमाके (वय 20 रा. शेंदुरजणे) आणि रमेश विनायक जाधव (वय 28 रा. खानापूर) अशी मृत्यू झालेल्यां ची नावे आहेत. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. त्यामुळे अनेक तरुण विहिरी, कालवे आणि तलावामध्ये पोहण्यासाठी जात आहेत. सोमवारी सायंकाळी यश, रंगदास, आणि रमेश पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यासने ते पाण्यात बुडाले. यापैकी यश आणि रंगदास यांचे मृतदेह मंगळवारी सकाळी मिळून आले आहेत. तर, रमेश याचा मृतदेह अद्याप मिळाला नसून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वाई पोलीस ठाण्यातून व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, सोमवार दिनांक 21 रोजी दुपारी 12 च्या सुमारास सुतारकी नावाच्या शिवारातील कालव्यात यश सुभाष दाभाडे वय वर्षे -13 रा.बावधन हा पोहोण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला अशी फिर्याद बावधन ग्रामस्थ दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध केली तरीही तो मिळून आला नाही. कालव्यातील पाणी पाटबंधारे खात्याला सांगून बंद करण्यात आले त्यावेळी तो मंगळवारी पहाटे चार वाजता महादेव नावाच्या शिवरात बांवधन परिसरातच कालव्यात त्याचा मृत देह आढळून आला. अशी माहिती वाई पोलीस ठाण्यातून देण्यात आली अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.