(छाया : पुजा भोसले)
खटाव : श्रमसंस्कार शिबीरातुन युवकांच्या अंगी शिस्त तसेच परिश्रम करण्याची जाणीव निर्माण होते. युवकांमध्ये श्रम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. आपल्या बुध्दीची व ताकतीची जोड लावल्यास कोणतेही काम सहजपणे करता येते निश्चित दिशा ठरवुन केलेले काम सहजपणे करता येते .जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी आपले ध्येय व दिशा निश्चीत करुन जीवनात वाटचाल करावी असे प्रतिपादन माजी आयुक्त कोकण विभाग प्रभाकर देशमुख यांनी केले.
कुरोली, ता. खटाव येथे शहाजीराजे महाविद्यालय खटाव यांचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना तसेच सारथी सामाजिक संस्था कुरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करणेत आले होते. त्याच्या समारोप प्रसंगी देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय पाटील हे होते. या वेळी प्रमुख उपस्थिती आमदार जयकुमार गोरे, पं. स.सभापती संदिप मांडवे, डॉ. विवेक देशमुख, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, अॅडव्होकेट भरमगुडे, स्वानंद गोसावी, अभिषेक जोशी आदिची होती.
या वेळी बोलताना आ.गोरे यांनी विद्यार्थ्यांनी श्रमदानातुन तयार केलेल्या वनराई बंधारे तसेच गावत केलेली स्वच्छता, प्लास्टीक मुक्तीसंबधी केलेली जनजागृती तसेच पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भात केलेले प्रबोधन आदि पाहता विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना तसेच त्याच्या श्रमदानाला किती महत्व आहे हे दिसुन येते. श्रम संस्कार शिबीराच्या माध्यमातुन विद्यार्थ्याला बरेच काही शिकावयास मिळत असते .मनातील असणार्या स्वप्नाला कष्टाची जोड लावुन परिवर्तन व बदल घडवुन आणण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे आणि या श्रम संस्कार शिबीराच्या माध्यमातुन ते घडुन येते असे सांगितले. या प्रसंगी सभापती संदिप माडंवे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या वेळी संजय ननावरे, उमेश सुतार, हरिदास बनसोडे, संतोष पाटोळे, अक्षय गांधी, मनोज काबंळे, हर्षद यादव, राजेंद्र देशमुख, राजकुमार दोशी, लक्ष्मण शिंदे, सुहास देशमुख, सुजीत देशमुख, जितेंद्र देशमुख, प्रतापराव देशमुख, सागर गुरव, आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.रामचंद्र पवार यांनी केले सुत्र संचालन प्रा.प्रमोदिनी काबंळे यांनी केले आभार अक्षय वायदंडे यांनी मानले.