सातारा : पुणे सातार्या पासून दोन तासांच्या अंतरावर आहे. आज पुणे शहराचा विकास कसा झाला आहे, ते आपण बघत आहे. त्या तुलनेत सातार्यातील कारखान्यांची दुरवस्था झाली आहे. शिरवळ मध्ये मोठे उद्योग आले. पण आज एमआयडीसीमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सातार्यात उद्योगपती येत नाहीत. आमच्या पक्षाचे उद्योग मंत्री सुभास देसाई यांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्यातील औद्योगीक क्षेत्रातील आणि टोल नाक्यावरील दहशत मोडून काढून सातारा जिल्हा दहशत मुक्त करणार आहे, असे शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सातार्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
सातार्यात कोणाची दहशद आहे ? कोण टोल नाक्यावर जाऊन दंगा करतात? कोणी बंगल्यावर येऊन राडा केला? कुणावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले,? याची कल्पना जनतेला आहे. मी सांगणे गरजेचे नाही. सातारा ऐतिहासिक जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश प्रलंबीत आहेत. वीज , शेती पाण्याचा प्रश सुटलेले नाहीत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिगणात उतरलो आहे. सातार्यातील टोल नाक्यावर सध्या मोठा झोल सुरू आहे. या झोल मधून सातारच्या जनतेला टोल मधून मुक्तच करून टाकणार आहे. पक्षाच्या सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून, ते नाराज नाहीत. ते आमच्या बरोबरच आहेत.असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
मी प्रचार करण्यासाठी कोणत्याही स्टाईलचा वापर करणार नाही. स्टाईल ही टेम्पररी असते, मला पर्मनंट विकासाची कामे करायचे आहे, असा खा. उदयनराजेंचे नाव न घेता कॉलर उडविण्याच्यास्टाईलची खिल्ली उडवली. आमदार शंभूराज देसाई म्हणाले, युतीचा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. आम्ही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणूकीला एकत्र सामोरे जात आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करून सेनेचा खासदार म्हणून नरेंद्र पाटील यांना निवडून आणले जाणार आहे. पाटण तालुक्यातुन किती मताधिक्य देणार या प्रश्नाला उत्तर देताना, शंभूराज देसाई म्हणाले, निवडणूकित दिसेल. मी आता यावर बोलणार नाही.
पुरूषोत्तम जाधव म्हणाले, उमेदवारीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही. मी पक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडुन आणण्यासाठी काम करणार आहे. 1996 ची पुरावृत्ती पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात झालेली पहायला मिळणार आहे. पत्रकार परिषदेला आमदार शंभूराज देसाई, शेखर चरेगावकर,भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नितीन बानूगडे-पाटील, एकनाथ ओंबळे, युगांघरा साळेकर,चंद्रकांत जाधव व महिला पदाधिकारी उपस्थिती होती.आर. पी. आय. पक्षाला निमंत्रण नसल्याने जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड या वेळी उपस्थित नव्हते अशी त्यांनीच माहिती दिली.
औद्योगीक क्षेत्रासह टोल नाक्यावरील दहशत मोडून काढणार: नरेंद्र पाटील
RELATED ARTICLES