महाबळेश्वर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धे मध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी महाबळेश्वर पालिका व प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असून सर्वेक्षणासाठीची जय्यत तयारी सुरु असल्याचे येथील सुखद चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण हि स्पर्धा जीकाणारच तसेच स्वच्छ महाबळेश्वर साठी व प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर साठी जीवाचे रान करणारच असा निर्धार महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ.स्वप्नाली शिंदे ,उपनगराध्यक्ष अफझल सुतार तसेच त्याचे सर्व सहकारी नगरसेविका व नगरसेवक तसेच पालिका मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केला आहे. दरम्यान महाबळेश्वर मध्ये प्रवेश करताच स्वच्छ महाबळेश्वर साठी व प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर साठी चे संदेश देणारे फलक ,भित्ती पत्रक ,रस्त्यांच्या कडेचे संरक्षक कठडे रंगीबिरंगी रंगानी नटलेले दिसत असून नागरीकातून याचे स्वागत होत आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धे अंतर्गत महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 अभियानात सहभाग घेतला आहे. आजपर्यंतच्या या अभियानअंतर्गत कामामध्ये महाबळेश्वर पालिका अनेक बाबतीत आघाडीवर असून देशात अव्वल ठरण्यासाठी तिचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत .यासाठी लोक प्रतिनिधी स्तरावर ,स्थानिक प्रशासन स्तरावर व विविध सेवाभावी संस्था महाबळेश्वरचे नागरिक याचे निकराचे प्रयत्न सुरु असून सर्वत्र या सर्वेक्षणाची तयारीच सुरु असल्याचे चित्र आहे. रात्र असो कि दिवस सर्वत्र स्वच्छता हा एकच विषय व जनजागृती सुरु असल्याचे चित्र आहे .या पूर्वीही अनेक अभियाने राबविली गेली मात्र या खेपेची तयारी अत्यंत वाखानाण्यासाठीची आहे .या अभियान स्पर्धेमुळे व त्यातील भारदस्त सहभागामुळे महाबळेश्वरचे नवनवीन सजविलेले रूप सध्या येथे पहावयास मिळत आहे. जानेवारीतील या स्पर्धांच्या सर्वेक्षणासाठी हि नागरी सजू लागली असून सर्वत्र एकच लगबग पहावयास मिळत आहे. या पर्यटनस्थळी ची हद्द सुरु होताच स्वच्छता व प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर साठीचे मोठ मोठाले होल्डीग्ज (फलक) झळकताना दैसात आहेत तर जस जशे नगरीत प्रवेश करू तसतसे अधिकाधिक नागरी साज्ल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी पदपथ यावर या अभियानांतर्गत विविध जागृती करणारे आंतर अंतरावर अनेक फलक दिसत असून बहुतेकसर्व रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंती ,कठडे या संदेशांनी रंगविल्यामुळे आकर्षक दिसत आहेत.तसेच जस जशी सर्वेक्षांची तारीख जवळ येत आहे तास तशी या कमानी अधिकच गती घेतल्याचे चित्र असून कोणत्याही परिस्थितीत महाबळेश्वर ही स्पर्धा अव्वल स्थानावर राहून जिंकणारच असा विश्वास स्थानिक लोकप्रतिनिधी ,स्थानिक नागरिक व प्रशासनाला वाटत आहे.