सातारा : सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये, जलक्रांती, हरित क्रांति, औधोगिक क्रांती इत्यादीबाबत मोठया मोठया चर्चा होतात. परंतु लोकशाही, हुकुमशाही, भंाडवलशाही सारख्या कोणत्याही व्यवस्थेमध्ये समाजाचा मुळ आधार असलेल्या कष्टकरी कामगार वर्गाला, अलिकडच्या काळातही, सत्ताधा-यांकडून(वापरा आणि फेकून दया) युज अॅन्ड थ्रो सारखी वागणुक दिली जाते याची मनस्वी चीड वाटतेच आम्ही मात्र, कामगार आणि कष्टकरी व्यक्तीचा यथोचित सन्मान करीत आलो आहोत किंबहुना अशीच आमच्या घराण्याची तथा आमचे वडील स्व.दादामहाराज यांची शिकवण आहे. 1 मे रोजीचा कामगार दिन तथा महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात साजरा करताना त्याचे पडसाद एका दिवसापुरते नव्हे तर वर्षभर उमटले पाहीजेत, अश्या भावोत्कट शब्दात, सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कामगार दिनाच्या संघटीत, असंघटीत अश्या सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करीत असते. शेतकरी शेतात काम करत असतो, शासनातील व्यक्ती शासकीय काम करीत असतात, एरिगेशनस्कीम, धरणे, बंधारेे उत्पादन, व्यापार व्यवसाय, यामध्ये काम करणारे देखिल कामगारच असतात, त्यामुळे तसे पाहीले तर सर्वजण कामगार आहेत. परंतु काही व्यक्ती स्वत़:ला मॅनेजमेंटचे व कष्टकरी वर्गापासून वेगळे समजतात. अश्या वेगळया भावनेतुनच कामगारांची पिळवणुक सुरु होते. वास्तविक भांडवलदार आणि कामगार या एका दुचाकी गाडीची दोन चाके आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी कामगारवर्गाच्या चाकाला म्हणचेच दुचाकीचे मागच्या चाकाला ड्राईव्ह दिलेला आहे, म्हणजे दुचाकीचे मागचे चाक पळाले तर पुढचे पळते. म्हणूनच कष्टमय, धोकादायक क्षेत्रात जिवाची बाजी लावून काम करणारा कामगार केंद्रबिंदू मानून, फायदयामधील जास्त वाटा कामगारांना दिला गेला पाहीजे.कामगारांनी कामच केले नाही तर कोणत्याही आस्थापनाचे कार्य सुरु राहणार नाही, नुसते आर्थिक आणि यंत्रसामुग्रीचे भांडवल असून, कोणी कामच केले नाही तर कोणत्याही प्रकारची उत्पादकता निर्माण होणार नाही त्यामुळे कामगारांना वेळचेवेळी सन्मान हयुमन डिग्नीटी दिली गेली पाहीजे, तरच कोणत्याही देशाची प्रगती शक्य आहे. दुर्देवाने आपल्या महान लोकशाहीत अलिकडच्या काळात सत्ताधारी एफडीआय मिळवण्याच्या प्रयत्नात किंवा गुंतवणुक होण्याकरीता भांडवलदारांंना पायघडया घालत आहेत, त्याचवेळी गुंतवणुक ज्या ठिकाणी होत आहे त्या स्थानिक ठिकाणच्या भुमीपुत्रांच्या जमिनी घेउन त्यंाच्या छाताडावर बसून त्यांनाच विस्थापित करुन देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सर्वच ठिकाणी होत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आणि समाचाजा कणा असलेल्या कामगार वर्गाचा यथोचित सन्मान सर्वांनीच नेहमीच ठेवला पाहीजे, आणि 1 मे च्या जागतिक कामगार दिनाचे पडसाद सातत्यपुर्ण दिसले गेले पाहीजेत. कष्टकरी-कामगार हिताकरीता आम्ही नेहमीच पुढाकार घेवून कामगारांच्या बाजुने ठामपणाने उभे राहीलेलो आहोत, तीच आमची परंपरा आहे. आमचे वडील स्व.दादामहाराज उ़र्फ प्रतापसिंहमहाराज यांनी घालुन दिलेला हा पायंडा आहे. कामगार दिनाच्या संघटीत, असंघटीत, कायम, रोजंदारी अशा सर्व प्रकारच्या कष्टकरी कामगार वर्गाला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
खा. उदयनराजेंकडून कामगार दिन व महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा
RELATED ARTICLES