साताराः सध्या भीषण दुष्काळाचे सावट गडद होत असताना, ख्।ासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांनी आपल्या संसद सदस्य पदाच्या तिसर्या टर्मची सुरुवात आक्रमकपणे केली असून, दुष्काळाची चिंता करुन, उपाययोजनांवर भर द्या, कार्यकर्त्यांनी लोकसभेतील विजयाबाबत विजयोत्सव साजरा करु नका असे घोषित करणार्या खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांनी आज खटाव तालुक्यातील म्हासुर्णे,पारगांव,येळीव तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याविष्।यी सातारच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरुन तसेच उरमोडीचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव यांच्यासमवेत चर्चा करुन, उरमोडीचे पाणी या तलावात सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय लावून घेतला.सध्या म्हासुर्णे,पारगांव,येळीव तलाव कोरडे पडलेले आहेत, या तलावावर अवलंबुन असलेल्या पाणी उपसा योजना पूर्णपणे पाणी नसल्याने कोलमडल्या आहेत, माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड कोंडी झाली आहे, त्यामुळे पुसेसावळी, पारगांव, गोरेगांव, म्हासुर्णे, वडगांव, गाडेगांव, उंचीठाणे, श्।ेनवडी, आदी गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, उरमोडीचे पाणी म्हासुर्णे,पारगांव,येळीव तलावात सोडण्यात यावे अश्।ी आग्रही मागणी खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांनी सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे आज केली. या वेळी उरमोडीचे कार्यकारी अभ्।ियंता श्री.जाधव उपस्थित होते. लोकांना पिण्याचे पाणी नाही, उरमोडीतील पाणी तातडीने या तलावात सोडावे अशी मागणीदेखिल संबंधीत गांवातील ग्रामस्थांनी केली असून, अद्यापि पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याहुन गंभीर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, याकरीता उरमोडीचे पाणी म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात सोडण्यात यावे असेही यावेळी खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.एकंदरीत भीषण दुष्काळ परिस्थिती, ग्रामस्थांची आणि खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांची मागणी याचा साधक-बाधक विचार करुन, जिल्हाधिकारी यांनी सेामवारपासून उरमोडीचे पाणी सोडण्याबाबत उरमोडीचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव यांना सूचना दिल्या.दरम्यान, आपल्या संसद कार्यकालाच्या तिसर्या टर्मची सुरुवात विजयाच्या दुसर्याच दिवशी करुन, आता आपण अधिक आक्रमकपणे समाजाकार्यासाठी झोकुन देणार असल्याचे खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांच्या देहबोलीवरून स्पष्ट होत आहे. खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भ्।ोसले यांनी दुष्काळी पटयात पाणी सोडण्यासंदर्भात आग्रही भुमिका मांडल्यानेच, म्हासुर्णे,पारगांव,येळीव या तीन तलावात उरमोडीचे पाणी सोडण्यात येणार आहे. यावेळी खासदार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांचे स्वीय सहा. प्रताप शिंदे, पारगांवचे शिवाजीराव बाळा पवार, पुसेसावळीचे चंदकांत शंकरराव पाटील, गोरेगांव-वांगीचे बबनराव कदम,हिम्मतराव माने,वडगांव जयरामस्वामीचे संतोष घार्गे,रहाटणीचे ज्योतीराम (दादा) थोरात, शेनवडीचे चंद्रकांत पाटील,वांझोळीचे मगरआबा, म्हासुर्णेचे दिनकरराव माने,उंचीठाण्याचे शिवाजीराव शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांची जनसेवेची आक्रमक सुरुवात
RELATED ARTICLES

