सातारा : देश पातळीवर अल्पसंख्यांक व दलित समाजावर होणार्या विविध अत्याचार व दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळून सुद्धा मोदी सरकारने मौन धारण केले होते. याचा तीव्र निषेध मतदान यंत्रणाद्वारे दाखवून देण्यासाठी सातार्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा देण्यासाठी दलित संघटनेमध्ये चढाओढ लागलेली आहे. तर दुसर्या बाजुला वंचित आघाडीने राष्ट्रवादी व सेनाभाजपच्या धोरणाविरोधात जनजागृती मोहिम आखल्यामुळे त्यांची मनधरणी कशी करावी? असा प्रश्न दलित नेत्यांना पडला आहे.
सातारा जिल्ह्यात 1952 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारचे सुपुत्र खंडेराव सावंत यांना आमदार करून दाखविले होते. त्यानंतर 35 वर्षाने दुष्काळी माणचे धोंडीराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपतराव अवघडे हे राखीव मतदार संघातून दलितांचे प्रतिनिधीत्व करीत होते. सध्या ङ्गलटणचे आ. चव्हाण हे राखीव मतदार संघातून प्रतिनिधीत्व करीत आहेत. लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या वतीने खा. श्री. छ. भोसले यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर आरपीआयचे आ. जोगेंद्र कवाडे, दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे, गवई गटाचे निरिक्षक हेमंत भोसले, संतोष सकपाळ, चंद्रकांत कांबळे यांच्यासह अनेकांनी स्वत:हून खा. भोसले यांची भेट घेवून आमचा पाठिंबा असल्याचे जाहिर केले आहे. त्या अगोदर सेना-भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची सुद्धा दलित कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चाचपणी केली होती. पण त्यांना फारसे यश आले नाही.
सातारा जिल्ह्यात अडीच ते तीन लाख दलित समाजाची लोकसंख्या आहे. वंचित बहुजन आघाडीने हाच धाग पकडून मोर्चा बांधणी केली आहे.
अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा रद्द करावा, अशी जाहिर मागणी यापूर्वी खा. श्री. छ. भोसले यांनी केली होती. त्यामुळे विविध दलित संघटना नाराज झाल्या होत्या. आज ही वंचित आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दलित समाजाचे कार्यकर्ते वाड्या वस्तीत जाऊन उघडपणे भूमिका मांडत आहेत. तर दुसर्या बाजुला दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्याची घाई झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आरपीआयचे आठवले गटाचे कार्यकर्ते सुद्धा सेना-भाजप युतीवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत वंचित आघाडीला जास्तीत जास्त मते पदरात पाडून घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात सोशल मिडिया व फेसबुकचा वापर करण्यासपेक्षा प्रत्येक्षात मतदारांपर्यंत जाण्याची गरज आहे. हेच ते विसरले आहेत.
तर दुसर्याबाजुला खा. भोसले यांची लोकप्रियता आणि दलित समाजाचे प्रेम यामुळे त्यांच्या पारड्यात दलितांची मते जातील पण, मराठा समाजाच्या मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
छ. उदयनराजेंना पाठिंबा देण्यासाठी दलित संघटना व आरपीआयच्या विविध गटाची चढाओढ
RELATED ARTICLES

