सातारा : सलग तिसर्यांदा संसदेत जाण्यासाठी सिद्ध झालेल्या खा. श्री. छ. उदयनराजेंना संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस, व, मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ खटाव तालुक्यात वर्धनगड, नागनाथवाडी, पुसेगाव, खटाव, ललगुण, राजापूर, फडतरेवाडी येथे झालेल्या प्रचार सभांमध्ये त्या मतदारांशी संवाद साधत होत्या. या प्रचार दौर्यात वडुजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजीकाका भोसले, विठ्ठलराव फडतरे, मोहनराव जाधव, नवनाथ फडतरे, कैलासराव घाडगे, बाळासाहेब इंगळे, काका धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवछत्रपतींचे थेट वारस असलेल्या उदयनराजेंकडे जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आजवर त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीमधून विकासकामांचा झंजावात निर्माण केला आहे. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी आपुलकी, जिव्हाळा जपला आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी जनतेत नेहमीच आदरभाव व्यक्त होत असतो. आजवर सलग दोनदा संसद सदस्य म्हणून त्यांना मतदारराजाने निवडून दिले आहे. यावेळीही मोठ्या मताधिक्याने त्यांना पुन्हा संसदेत पाठवा. दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविणारे झुंजार नेतृत्व म्हणून त्यांना खटावमधील जनतेने आग्रहाने मतदान करावे, असेही राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यावेळी म्हणाल्या.
वर्धनगड, ललगुण, राजापूर, खटाव, पुसेगाव आदी सर्वच गावांमध्ये त्यांचे ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे स्वागत केले व महाराजसाहेबांना या निवडणुकीत उल्लेखनीय मते देऊन संसदेत पाठवू व रयतेच्या राजाप्रति आदर व्यक्त करू, असे सांगितले.
या दौर्यात झालेल्या जाहीर सभांना आणि प्रचारफेर्यांमध्ये शालिनीताई घोरपडे, गीतांजली कदम, अश्विनी गुरव, राजेंद्र घाडगे, हुसेनभाई शिकलगार, योगेश लवंड, दीपक शिरतोडे, जयवंत गोसावी, वसंत पवार, जयवंत पवार, मनोज देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मानाजी काका घाडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेश गुरव यांनी सूत्रसंचालन व मोहनराव जाधव यांनी आभार मानले.