कराड : कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणे काम करण्याची चिकाटी हवी. पुरस्काराच्या पाठीशी मेहनतीची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केले.
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात आदर्श फौंडेशनचे वतीने झालेल्या कार्यक्रमात पत्रकार उमेश सुतार यांना नॅशनल युनिटी अॅवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ प्रसार माध्यम तज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, नगरसेविका दमयंती आचरे, डी. एम. सुतार या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
तृप्ती देसाई म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतरही बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा देण्याची गरज निर्माण होवू लागली आहे, ही चिंतेची बाब आहे. मुलगी झाली की बर्फी नाही तर पेढे वाटण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजात चुकीची गोष्ट होत असेल तर तेथे ताईगिरी करावी, यासाठी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून ताईगिरी पथक निर्माण केली आहेत. याला समाजाने सहकार्य करावे. यावेळी डॉ. विश्वास मेहेंदळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, अॅड. अजितसिंह राणे, शिक्षण उपसंचालक किरण लोहार, डी. एम. सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक व आभार विजय लोहार यांनी मानले.
पत्रकार उमेश सुतार यांना नॅशनल युनिटी अॅवॉर्ड प्रदान
RELATED ARTICLES