वाईः उन्हाळयाची चाहूल लागताच सुर्यनारायण तळपू लागल्याने उन्हाची दाहकता व भीषणता दिवसेंनदिवस वाढत चालली आहे. दुष्काळी पटट्यात न येणार्या परिसरातही पाण्याचे स्त्रोत आटले असून पाण्याचे दुर्भिक्श जाणवत आहे. दुष्काळाचा जास्त परिणाम हा प्राणी, पक्षी यांच्यावर जास्त होत असतो. पाण्यासाठी दाही दिशा त्यांना वनवन फिरावे लागते. अशावेळी पाण्याच्या शोधात असताना त्यांची शिकार होण्याची शक्यता जास्त असते. तरीही आपला जीव धोक्यात घालून पाण्यासाठी फिरावेच लागते.
कडक उन्हाळा पाणी टंचाईच संकट आ-वासून येणारा यात शंकाच नाही ़ आतापासूनच माणसांच्याच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे ़व ऐन उन्हाळयात ती प्रकर्षाने जाणवणार आहे ़ मग आधीच आपल्यापासून दूर चाललेल्या पशू व पक्षांची हालत बघायलाचनको ़मग या छोटया जीवांसाठी ही आपण काहीतरी केलेच पाहिजे या भावनेतून पसरणी घाटात मॉर्निंग वॉक करणार्या रामप्रहर व भगवा कटटा गु्रपच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये पसरणी घाटात अनेक ठिकाणी झाडांवर पक्षांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली असून सकाळ-संध्याकाळी घाटात फिरायला येणारे तरूण, महिला, जेष्ठ नागरिक यांनी दररोज भांडयामध्ये पाणी ओतण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या रामप्रहर व भगवा कटटा गु्रपच्या 16 सदस्यांच्या माध्यमातून 45 झाडांवर पक्षांसाठी भांडी लावण्यात आली आहेत.तरीवाई शहरातील अनेक नागरीक पसरणी घाटात मॉर्निंग वॉकसाठी दररोज जात असतात तेव्हा प्रत्येक नागरीकांनी घाटात फिरायला जाताना एक पाण्याची बाटली नेहून ठिकठिकाणी लावलेल्या भांडयामध्ये ओतून सहकार्य करावे असे अवाहन गु्रपच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे.
तहानलेल्या पक्षांसाठी वाईतील तरूणांकडून पसरणी घाटात पाण्याची सोय
RELATED ARTICLES