सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशातील सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून देशाला लोकशाही दिली परंतू आज त्याच लोकशाहीचे केंद्रीकरण करुन भांडवलशाही आणी घराणेशाही मध्ये अडकली असल्याने सर्वसामान्य समाज घटकांना ही लोकशाही आपलीशी वाटत नाही त्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते व वंचित बहुजन आघाडीचे प्रनेते मार्गदर्शक अँड.बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी वंचित समाज घटकामध्ये आत्मविश्वास निर्माण करून लोकसभेच्या निवडणूकीत उतरवले व वंचित घटकात ऐकता निर्माण झाल्यानेच वंचित समुहाला ही लोकशाही आपली वाटू लागल्याने येणार्या विधानसभा निवडणूकीमध्ये पुन्हा एकदा ताकतीने सातारा जिल्ह्यात सूद्धा वंचित बहुजन आघाडी उतरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली.
यावेळी वंचित बहूजन आघाडीचे नेते अँड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी ई व्ही ऐम ला विरोध करून बँलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी या मागणीवर ठाम राहून सातारा जिल्ह्यातही याबाबत लवकरच आंदोलन उभारण्यात येईल तसेच ग्लोबल विकासाचे स्वप्न दाखवून ई व्ही एम च्या माध्यमातून निवडणूक जिंकणार्यांना वंचित बहुजन आघाडी सर्व सामान्य जनतेला अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य,शिक्षण,आणी रोजगार आणी सुरक्षा या विषयाची हमी देऊन त्याबाबत जन जाग्रती करुन जनतेच्या मुलभूत विकासाच्या बाजूने ही निवडणूक ताकतीने लढवणार असून सातारा जिल्ह्यातील आठवी ही विधानसभा ह्या विवीध आठ समूहातील प्रतीनीधींना संधी देऊन अतीशय एकसंघपणे ताकतीने लढवणार असल्याचेही मत व्येक्त करनेत आहे.
यावेळी सोमवार दि.10 जून 2019 रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा सातारा यांच्या वतीने वाई विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या मतदारांनी स्वाभीमानाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान दिले त्या मतदार बंधू भगीनिंनी व कार्यकर्त्यांचे आभार मानन्यासाठी वाई शहरातील श्री कृष्णसोा मंगल कार्यालय,मधली आळी वाई येथे आभार मेळावा सकाळी 11.30 वा.सांगली लोकलभेचे तरुन तडफदार उमेदवार गोपीचंद पडळकर,माढा मतदार लंघाचे उमेदवार अँड.विजयराव मोरे , सातारा मतदारसंघाचे उमेदवार सहदेव ऐवळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष पार्थ पोळकेसर व राज्य प्रवकिते मा.सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तप जिल्हा प्रमूख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली तर मेळाव्याचे स्वागताध्यक्ष दाऊद ईनामदार व वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थीतीत आयोजीत केला असून या मेळाव्यात स्वाभिमानी मकदारांचे आभार मानन्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणूकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही पत्रकात सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकतीने उतरणारः चंद्रकांत खंडाईत
RELATED ARTICLES