सातारा : महिलांसाठीची चूल आणि मूल ही संकल्पना आता खुप दुर गेली आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहेत आणि गर्वाने कार्यरत आहेत. रिमांड होमध्ये अनेक निराधार मुली शिक्षण घेत असतात.
या मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी खूप शिकले पाहिजे. शिक्षण हाच स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमीत्त कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने रिमांड होम मधील मुलींचा सत्कार आणि भोजन वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी अरुणा पोतदार, शारदा बर्गे, लिना माने, मनिषा पवार, उषा खुडे, लतिका येवले, विमल शिंगरे, वर्षा जाधव, सोनिया शिंदे, शितल तुपे यांच्यासह कर्तव्य ग्रुपच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
जागितक महिला दिन हा वर्षातून एकदा साजरा केला जातो. मोल मजुरी करणार्या गोर गरीब, वंचीत स्त्रीयांना त्यांच्या पायावर उभे करणे. त्यांना सक्षम केले पाहिजे. तरच महिला दीन साजरा करण्याचा उद्देश सफल होणार आहे. रिमांड होम सारख्या संस्थेमध्ये वंचित समाजातील, अनाथ मुले आणि मुलींचे संगोपन केले जाते. याठिकाणच्या मुलामुलींनी या संस्थेच्या माध्यमातून चांगले शिक्षण घेतले पाहिजे.शिकाल तर टिकाल या उक्तीप्रमाणे शिक्षण हा प्रत्येकाच्या प्रगतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सर्वांनी चांगले शिक्षण घ्यावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे आणि देशाचे एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी याप्रसंगी केले.
स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण हाच पर्याय:सौ. वेदांतिकाराजे
RELATED ARTICLES