पाटण:- पाटण तालुका हा स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका आहे. १९४८ साली महात्मा गांधीचीं हत्या झाली. त्यावेळी प्रक्षुब्ध जमाव पाटण गावातील ब्राह्मणपुरीवर चाल करून आला. या जमावाला वीर फौजदार माने-देशमुख यांनी पाटणच्या बाजार स्थळावरच आढवीले. जमावाला शांत करताना वीर फौजदारांना हवेत गोळीबार करावा लागला. यावेळी प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने फौजदार माने-देशमुख यांच्यावरच भेभान दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्यात जमावाला ब्राह्मणपुरीच्या दिशेने एक पाऊल हि पुढे सरकू न देता. जमाव आढवून धरला. यावेळी वीर फौजदार माने-देशमुख कर्तव्य बजावत आसताना शहीद झाले. अशा या कर्तव्य दक्ष वीर फौजदार यांच्या नावाने असलेले माने-देशमुख विद्यालय महाराष्ट्रातील ऐकमेव विद्यालय आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा पोलिस जवानांना आहे. असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक उत्तमराव भापकर यांनी केले.
पाटण येथील माने-देशमुख विद्यालयात वीर फौजदार माने-देशमुख यांचा स्मृती दिन व जन्म शताब्दी साजरी करण्यात आली असता सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी पो.नि. उत्तमराव भापकर बोलत होते. या कार्यक्रमास कोयना शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील, जेष्ट सदस्य डॉ. प्रल्हादराव चव्हाण, सदस्य संजीव चव्हाण, प्राचार्य सर्जेराव चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पो.नि. भापकर पुढे म्हणाले १९४८ साली महात्मा गांधी यांची हत्या झाली त्यावेळी संपूर्ण देशभर दंगल उसळली होती. त्याचे पडसाद पाटण सारख्या ठिकाणी उमटले. ब्राह्मणपुरीवर चाल करून आलेला प्रक्षुब्ध जमाव वीर फौजदार माने-देशमुख यांनी त्यावेळी आढवला नसता तर पाटण गावात काय परस्थिती निर्माण झाली असती याचा विचार करणे हि अवघड झाले असते. अशा बिकट अवस्थेत कर्तव्य दक्ष वीर फौजदार माने-देशमुख यांनी आपल्या जिवाची बाजी लावून प्रक्षुब्ध जमाव आढवून धरला व पाटण गावावर आलेले आनर्थ टाळले. अशा या थोर आणि वीर फौजदार माने-देशमुख यांना मानवंदना देताना सातारा जिल्हा पोलिस दलाला अभिमान वाटत आहे. पोलिस दलात वीर मरण आलेल्या फौजदार माने-देशमुख नावाने असलेले विद्यालय महाराष्ट्रात आदर्शवत आहे. याचा हि अभिमान आहे.
यावेळी संस्थेचे जेष्ट सदस्य डॉ. प्रल्हादराव चव्हाण, संजीव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तर शांलात स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान वीर फौजदार माने-देशमुख यांना सातारा पोलिस दल बँण्ड पथक, पाटण पोलिस जवान आणि माने-देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परेड देऊन मानवंदना दिली. यावेळी सुरवातीस प्राचार्य सर्जेराव चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रस्तावना केली तर कार्यक्रमाच्या शेवटी अरविंद सकपाळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास आबासाहेब भोळे, शंकर मोहिते, आनंदराव गुरव, पर्यवेक्षक पंडिंतराव गव्हाणे, अरविंद सपकाळ, विद्यार्थी प्रतिनिधी संकेत लोहार, अनुराधा यादव यांच्यासह शिक्षक, शिक्षकत्तोर सेवक वर्ग विद्यार्थी-विद्य्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.