वाईः पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांना मोठे अधिकारी बनता आले नाही, तरी देशाचे उत्तम नागरीक बनता आले पाहिजे, असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव गाढवे यांनी केले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत किसनवीर महाविद्यालय, वाई येथे 55 वा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला,त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक केशवराव पाडळे, सुरेश यादव, सचिव डॉ, जयवंत चौधरी, सहसचिव प्रा. नारायणराव चौधरी, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य अॅड. जगदीश पाटणे, विद्यापरिषद सदस्य डॉ. सुनील सावंत, भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. विनोद वीर, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात शंकरराव गाढवे पुढे म्हणाले, प्राचीन आणि आधुनिक विद्यापीठांमध्ये तुलना न करता आजच्या विद्यापीठांनी ज्ञानाबरोबरच संस्कारक्षम शिक्षणावरही भर देणे गरजेचे आहे. थोर स्वातंत्रसेनानी किसनवीर यांनी स्थापन केलेल्या या महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण दिले जात आहे.अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये सातत्याने चमकत आहेत, याचा संस्थेला विशेष अभिमान आहे प्रत्येकाने आपापल्या कामांवर निष्ठा ठेवल्यास संस्था मोठी होते.
संस्था पदाधिकार्यांच्या त्यागातून हे महाविद्यालय उभेराहिलेआहे. त्यामुळे संस्था समाजात शिक्षणाचे उत्तमकाम करीत आहे. पदवी प्राप्त स्नातकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचेप्राचार्यडॉ. चंद्रशेखर येवले म्हणाले, चांगला शिक्षक विद्यार्थाला लाभणे, हे त्या विद्यार्थ्याचे भाग्य असते. विद्यापीठात जाउन पदवी घेणे सर्व विद्यार्थ्यांना शक्य होत नाही, परंतु जेथे आपण शिकतो तेथेच आपल्याला पदवी घेता येते, याचा विद्यार्थ्यांना विशेष आनंद होत असतो.
विद्यापीठानेही संधी महाविद्यालयांना दिली असल्याने, त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पदवी प्रमाणपत्रांच्या यादीचे वाचन महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. हणमंत जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय खंडाळा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रतिभा पाटणे यांनी करून दिला. किसनवीर महाविद्यालातील व खंडाळा महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी किसनवीर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील कु. स्नेहाजंली ननावरे या विद्यार्थिनीला बी. ए. भाग 3 परिक्षेत इंग्रजी विषयात विद्यापीठात सर्व प्रथमआल्याबदद्ल कै. प्राचार्य भोगिसिना स्मृती पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन तिचा गौरव करण्यातआला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे व प्रा.डॉ. मंजुषा इंगवले यांनी, तर आभार प्रा. डॉ. शशिकांत बोटे यांनी मानले.
ज्ञान संपादनाबरोबरच विद्यार्थ्यांने उत्तम नागरीक बनावे : शंकरराव गाढवे
RELATED ARTICLES