पाटण:- रासायनिक खतांचा कुत्रिम तुतौडा दाखवून प्रत्येक वर्षी ५ ते १० % किमतीत वाढ करून छुप्या पद्धतीने खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांच्या पैस्यावर डल्ला मारण्याचे कुठील कारस्थान रासायनिक खतांच्या कंपन्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेले आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या वर अन्याय करणारा असून खतांच्या किमती कमी करा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा पाटण क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सातारा जि.प. माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
विक्रमबाबा पाटणकर पुढे म्हणाले शेतकऱ्यांना पिकाला दर मिळण्यासाठी संघर्ष उभा करून अनेक आंदोलने करावी लागली. रस्त्यावर उतरून पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या साखर सम्राट व सरकारच्या विरोधात रक्तबंभाळ व्हावे लागले. तवा कुठे शासनाला शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकून ऊसाला तीन हजार रुपये पर्यंत दर देण्यास भाग पडले. आणि इतर पिकांची देखील दर वाढ वाढली. या पट्टीतच खतांची देखील दर वाढ व्हायला पाहिजे होती. मात्र खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेठीस धरुन रासायनिक खतांच्या कंपन्या आणि शासनाचे अधिकारी संगनमताने रासायनिक खतांचा कुत्रिम तुतौवडा दाखवून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैस्यावर डल्ला मारण्याचे कुटील कारस्थान करत आहेत.
या राज्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी रासायनिक खतांचा दर १४५ ते २०० रुपये आणि सबसिडी विदाऊट ३५० रुपये होता. आता हाच दर ११५० रुपये पर्यंत गेला. या दरात आज अखेर १५ ते २० % ची वाढ करण्याचा निर्णय शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून खत निर्मिती करणाऱ्या केमिकल कंपन्यांनी घेतला. या खत दर वाढीचा फटका खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बसला आहे. क्रुत्रिम रीत्या झालेली रासायनिक खतांची दरवाढ तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी कदापिही सहन करु शकणार नाहीत. आज पाऊसाची वाट पहाणारा शेतकरी दुष्काळामुळे हैराण झाला आहे. वेळीच क्रुत्रिम रीत्या होणारी खतांची दरवाढ कमी न केल्यास व शेतकऱ्यांना पुरक खत पुरवठा न झाल्यास शेतकरी पेठून उठल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकरी क्रुषि आधिकाऱ्यांना रस्त्यावर फीरु देणार नाही. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी शेवटी सांगितले.