Saturday, June 21, 2025
Homeसातारा जिल्हापाटणगेल्यावर्षी अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्यास २५ मे पासून उपोषणाला बसणार...

गेल्यावर्षी अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्यास २५ मे पासून उपोषणाला बसणार -: विक्रमबाबा पाटणकर.

पाटण :- गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पाटण तालुक्यात अतिवृष्टी पावसाने व कोयना धरण व्यवस्थापनाच्या गलथान व नियोजन शुन्य कारभाराने धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, नागरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीची नुकसान भरपाई अल्पशाच नुकसान ग्रस्तांना मिळालेली आहे. अद्याप साडेतीन तीन हजार नुकसानग्रस्त हे नुकसानभरपाई पासून वंचित आहेत. लोकशाही मधे सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार असताना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये प्रलंबित असणारे पंचनामे दहा महिन्यापासून धुळ खात का पडले आहेत..? कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर कोरोनाच्या रोगाशी लढा देणाऱ्या शासकीय योध्दांना सहकार्याच्या भूमिकेतून पहात आसताना आम्ही गप्प होतो परंतु आता गेल्यावर्षी चा वाया गेलेला खरीप हंगाम कोरोना व लौकडाऊन मुळे व उद्याचा खरीप हंगामाला आम्ही कसे सामोरे जायच असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आसुन. या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत नुकसान भरपाई न दिल्यास सोमवार दि. २५ मे रोजी पाटण तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ करणार असून त्याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. असा इशारा सातारा जि.प. माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

गतवर्षी २०१९ जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पाटण तालुक्यात अतिवृष्टी पावसाने व कोयना धरण व्यवस्थापनाच्या गलथान व नियोजन शुन्य कारभाराने धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, नागरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या इलेकट्रीक पंप मुजलेल्या विहिरी, नदीकाठचे प्रवाहमुळे वाहून गेलेल्या जमीनी तसेच खरीप हंगामातील पिके यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई काही अल्पशा शेतकऱ्यांना मिळाली. मात्र अद्याप पाटण तालुक्यातील साडेतीन हजार शेतकरी या मदतीपासून वंचित राहिलेले असून त्यांना कोणतेही कसलीही मदत मिळालेली नाही. शासनाच्या या भेदभाव व दुजाभाव करण्याचा उध्देश व हेतू काय ? लोकशाही मधे सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार असताना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये प्रलंबित असणारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पंचनामे दहा महिन्यापासून धुळ खात का पडले आहेत..?

कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर कोरोनाच्या रोगाशी लढा देणाऱ्या शासकीय योध्दांना सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही गप्प होतो परंतु आता गेल्यावर्षी चा वाया गेलेला खरीप हंगाम कोरोना व लौकडाऊन मुळे व उद्याचा खरीप हंगामाला आम्ही कसे सामोरे जायच असा गंभीर प्रश्न शेतकऱ्याना पडला आसुन. या शेतकऱ्याना सात दिवसाच्या आत सदरची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यास सोमवार दि. २५ मे रोजी पाटण तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ करीत आहोत. त्याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. असा इशारा सातारा जि.प. माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी तहसीलदार पाटण यांना निवेदन देताना शासनाला दिला आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांची उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular