पाटण:- ( शंकर मोहिते ) कृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उर्मट भाषेत दिल्याने तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. गेले दोन अडीच महिने पाटण तालुक्यात संततधार झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांचा शेतातील सर्व पिके कुजून गेले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी विक्रमबाबा यांची आहे. या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे का? असा प्रश्न विक्रमबाबा पाटणकर यांनी कृषी अधिकारी यांना केला होता. मल्हारपेठ येथील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमावेळी आज (गुरूवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पाटण तालुक्यात पावसाचा वाढता जोर असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विक्रमबाबा पाटणकर गेल्या पंधरा – वीस दिवसांपासून करत आहेत. मल्हारपेठ येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात विक्रमबाबा पाटणकर यांनी तालुक्यातील कृषी अधिकारी प्रविण आवटी यांना तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली का असा प्रश्न विचारला यावेळी दोघांच्यात शाब्दिक वादावादी झाली. यातून विक्रमबाबा पाटणकर यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आवटी यांनी त्यांना विरोध केला असता पाटणकर यांनी कृषी अधिकारी आवटी यांच्या कानशिलात लगवाली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. यावेळी उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र शेतकऱ्यांची जाण असणारा नेता शेतकऱ्यांसाठी समोर येत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले.
या प्रकारानंतर विक्रमबाबा पाटणकर यांच्या विरोधात मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान कृषी विभागाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
विक्रमबाबा यांची उर्मट भाषा वापरणा-या कृषी अधिकारी यांच्या कानशिलात.
RELATED ARTICLES