परळी :- परळी खोऱ्यात कोरोनाचा पसार होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजनासाठी तहसीलदार आशा होळकर यांनी मानेवाडी येथील सभागृहात परळी भागातील तीनही मंडलातील अंगणवाडी सेविका, आशा, पोलीस पाटील, सरपंच यांची संयुक्त बैठक घेण्यात आली यावेळी शिवाजी मोहिते (परळी), युवराज गायकवाड (दहिवडी), अनिल जाधव (आंबवडे खुर्द)चे मंडलाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार होळकर म्हणाल्या परळी खोरे गेली कित्येक दिवस कोरोना पासून अलिप्त होते परंतु रायघर येथील युवक बाधित आढळल्याने सर्व गावसमित्यांच्या जबाबदाऱ्या ह्या वाढवल्या आहेत. मुंबई हुन प्रवास करून आलेले आपलेच स्थानिक यांना गावाच्या बाहेर कवरन्टीन करावे तसेच जर पर्याय घर असेल तर होम कॉरनटाईन केलेच पाहिजे परंतु तरीही नियम मोडून बाहेर फिरत असतील तर गावसमिती पोलीस पाटील सरपंच यांनी पहिल्यांदा 500 रुपये दुसऱ्यांदा 1000 असे दंड घ्यावे. तसेच कोरोनाचा प्रदूरभाव परळीखोऱ्यात पसरणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे.
कोरोना रोखण्यासाठी गाव समित्यांनी जबाबदारी घ्यावी -: तहसीलदार आशा होळकर
RELATED ARTICLES