Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदेशात सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही; विरोधकांची मन की नव्हे धन की बात :...

देशात सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही; विरोधकांची मन की नव्हे धन की बात : खा. उदयनराजे

सातारा : स्वतंत्र्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस विचारधारनेने भारत देशात जी प्रगती झाली व देश महासत्ता होणार असे वाटत असताना देशावर गेल्या पाच वर्षांपूर्वी एक भयानक संकट येऊन पोहोचले व देश पाच वर्षे मागे गेला. लोकशाहीची तत्वे मागे ठेऊन हुकूमशाहीच्या मार्गाने सत्ताधारी पक्षाची वाटचाल सुरु असल्याने येणार्‍या पुढील काळात भावी पिढीला योग्य दिशा मिळण्यासाठी आघाडीला साथ द्या, आणि लोकशाही टिकविण्यासाठी देशात सत्तांतराशिवाय गत्यंतर नसल्याचे प्रतिपादन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
ते कराड उत्तरचे विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनखाली मौजे.चरेगाव, ता.कराड येथे सुनील संपतराव पवार यांच्या घरासमोर आयोजित केलेल्या चरेगांव, खालकरवाडी, भवानवाडी, शितळवाडी, कळंत्रेवाडी आदि गावांतील प्रमुख कार्यकर्त्याच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
यामेळाव्यास कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, भास्करराव गोरे, संजय थोरात, सुरेश माने, डी. बी. बापू , पाल गावचे सरपंच जगन्नाथ पालकर, भरत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले की, काँग्रेस विचारसरणीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे मिळालेले योगदान हे खूप मोलाचे आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राजीव गांधींनी क्रांतीकारक निर्णय घेतले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात संगणक युगाचा प्रारंभ झाला. तद्नंतर या क्षेत्रात वाढ होवून मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचे वरदान लाभले. या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करून विरोधकांनी 2014 ची लोकसभा निवडणूक जिंकली. गेल्या साडेचार वर्षात विरोधकांकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय झाले नाहीत. सद्या जनता या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपली मतेे मुक्तपणे लोकशाही मार्गाने मांडत असताना, याच शासनाकडून मिडीयावर निरनिराळी बंधने आणण्याचा व जनतेचा आवाज बंद करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे सांगून आदरणीय शरद पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड उत्तरमधून विक्रमी मताधिक्य द्या असे आवाहन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी उपस्थितांना केले.
यावेळी हिम्मतराव डुबल-इनामदार, शितोळे सर, किसनराव बर्गे, भोसले सर, भरत देशमुख, संजय जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की दरवर्षी 2 कोटी नोकर्‍या देऊ असे बोलणार्‍या सरकारने प्रत्यक्षात काहीही केले नाही. उलट गेल्या पंचेचाळीस वर्षात नव्हती तेवढी बेकारी या पाच वर्षात वाढली आहे.गेल्या साडेचार वर्षात स्वतः चा वैयक्तिक स्वार्थ साधून मोठे झालेल्या मंडळींनी जर देशातील गरीब जनतेचा विचार केला असता तर ही जनता आज अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली नसती.म्हणून या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन या वेळी उदयनराजे यांनी केले.
याप्रसंगी देवराजदादा म्हणाले की, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना खरी संजीवनी देण्याचे काम हे काँग्रेस विचारसरणीच एक उदाहरण आहे. म्हणून या विचारसरणीच्या माध्यमातून देशाचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे.
त्यासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे असे आपले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करणेचे आवाहन केले.यावेळी मानसिंगराव जगदाळे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशामध्ये सुई सुद्धा निर्माण होत नव्हती पण आता देशाने प्रगतीला सुरवात केली व देश महासत्तेच्या वाटेवर येऊन पोहचला आणि आता विरोधकांकडून काँग्रेसने आत्तापर्यंत काहीच केले नसल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. देशाचे कृषिमंत्री असताना शरद पवारसाहेबानी 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र युती सरकारने केलेली कर्जमाफी ही वेगवेगळ्या निकषात अडकवून जनतेला कर्जमाफी पासून वंचित ठेवण्याचं काम हे युती सरकारने केले.
म्हणून या पुढील काळात शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतानी विजयी करण्याचे आवाहन मानसिंगराव जगदाळे यांनी केले.
यावेळी सतीश शिंदे, संजय म्हेत्रे, बाबुराव माने, गोविंदराव माने, पै.संजय माने, विक्रम माने, जयवंत माने, सुरेश पुजारी, शंकर पाटील, हैबतराव माने, सुभाष माने, बाळासाहेब माने, सर्जेराव यादव, महेश यादव, रणजीत यादव, निवास चव्हाण, नानासाो सुर्यवंशी, आत्माराम शितोळे, कृष्णत बर्गे, बलराज शितोळे, चंद्रकांत माने, सुनिल पवार, शशिकांत माने, अशोक दबडे, हिमतराव डुबल, शहाजी सुर्यवंशी यांचेसह चरेगांव, खालकरवाडी, शितळवाडी, भवानवाडी व कळंत्रेवाडी आदि गांवाचे ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular