साताराः सातारा शहरात अग्रगण्य असलेल्या व्यापारी सहकारी पतसंस्थेने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागास मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू.1 लाख फक्त चा चेक जिल्हा उपनिबंधक साताराचे प्रकाश अष्टेकर यांचेकडे संस्थापक चेअरमन गुरूप्रसाद सारडा यांचे हस्ते प्रदान केला. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या सातारा जिल्हयातील दुष्काळग्रस्त भागातील शाळा व विद्यार्थी यांना मदत म्हणून रू.1 लाखचा चेक रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांचेकडे संस्थेचे चेअरमन दिलीप पिलके यांचे हस्ते प्रदान केला.
संस्थापक चेअरमन गुरूप्रसाद सारडा यांचे सक्षम नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांनी प्रामाणिक व काटकसरीचे धोरण स्वीकारलेने पतसंस्थेची सर्व पातळीवर चौफेर प्रगती झालेली आहे. स्थापनेपासून सतत नफयात व ऑडीटचा सतत अ वर्ग मिळवून कायमस्वरूपी लाभांश देवून सामाजिक बांधिलकीचे धोरण स्वीकारून विविध प्रकारचे कार्यास अनेक व्यक्ती, संस्था यांना आतापर्यत रूपये 30 लाखाचे वर मदत केलेली आहे. सदरची मदत ही नफयातून तरतूद करून केलेली आहे. पतसंस्थेने आतापर्यंतचे केलेल्या कामाचे व आर्थिक बाबीचे अवलोकन करून मागणी न करताही स्वतःहून जबाबदारीने समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले याबद्दल जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे, प्रकाश गवळी, अॅड.सुभाष मुंढेकर, अॅड. बाळासो बाबर, डॉ.अच्युत गोडबोले यांनी पतसंस्थेचे कौतूक करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास संस्थेचे व्हा.चेअरमन शिवप्रसाद मिणीयार, सर्व संचालक, कर्मचारी, सभासद हितचिंतक व खातेदार उपस्थित होते. संस्थापक चेअरमन गुरूप्रसाद सारडा यांनी प्रास्ताविक व प्रमुख व्यक्तींचे स्वागत केले. संचालिका सौ.रजनीताई कदम यांनी आभार मानले.
व्यापारी पतसंस्थेची दुष्काळग्रस्त भागास रू.2 लाखाची मदत
RELATED ARTICLES