Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीवाई तालुक्यातील नऊ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा तर काही गावे टँकरच्या प्रतिक्षेत

वाई तालुक्यातील नऊ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा तर काही गावे टँकरच्या प्रतिक्षेत

वाई : जिल्हासह राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून वातावरणात प्रंचड तापमान वाढ झाल्याने अनेक ठिकाणचे जलश्रोत आठल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मोसमी पावसाचे प्रमाण जास्त असून ही पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे काही गावांना पाणी टंचाईला सामोरे जागत आहे. समोर पाणी दिसत असून कित्येक किलोमीटरची पायपीट पाण्यासाठी करावी लागते, ज्यांनी स्वतः घरावर तुळशी पत्र ठेवून धरण उभारणीसाठी जमिनी दिल्या त्यांच्या नशिबी नेहमीच फरपट पहायला मिळते. वाई तालुक्याचा पूर्व भाग पर्जन्य छायेखाली येत असून या वर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक गावांना पाण्याची टंचाई झाली आहे. टंचाईग्रस्त गावांनी वाई पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाला टँकरची मागणी केली असून आतापर्यंत नऊ गावांना टँकरने पाणी पुरवठा चालू केला आहे.परंतु गावांच्या लोकसंख्येच्या आधारे टँकरची मंजुरी देण्यात येते हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे, ज्या गावांमध्ये लोकसंख्या कमी आहे म्हणून पाण्याचा टँकर प्रशासन देणार नाही का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, कुसागांव जवळील विठ्ठल वाडीत प्रचंड पाणी टंचाई आहे या गावाची लोकसंख्या प्रशासनाच्या निकषात बसत नाही म्हणून टँकर दिला जात नाही. तरी वाई पंचायत समितीने मागेल त्या गावाला पाण्याचा टँकरदेण्यात यावा व त्यासाठी संबधित सदस्यांनी त्यात लक्ष घालावे अशीही मागणी जोर धरत आहे. यामध्ये गडगेवाडी-मांढरदेव, बौद्धवस्ती-माढंरदेव, गुंडेवाडी, विठ्ठलवाडी, बालेघर, धनगरवाडी, बोपर्डी, मोहडेकरवाडी,चांदक, पाखिरेवस्ती-ओहळी इत्यादी गावांना पाणी पुरवठा चालू असून गाढवेवाडी व आनंदपुर या दोन गावांना येत्या दोन दिवससात टँकर सूरू करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी उदयकूमार कुसूरकर यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार मकरंद पाटील यांनी आढावा बैठक घेवून महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळा तालुक्यातील गावांची यादी पंचायत समितीला देत गावातील पाणी साठयाबाबत पूर्वानुभव लक्षात घेऊन कोणत्याही क्षणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते, हे लक्षात घेऊन उपाययोजना करा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी ग्रामपंचायती व प्रशाससनाला केले.
टँकरने पाणी पुरवठा, योजनाची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्यांची गळती काढणे, विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण, मंजूर कामे पूर्णत्वास नेणे, नदी -धरणातील पाणी कमी झाल्याने साठवण टाक्यांव्दारे पाणी पुरवठा, पाऊस सुरु होण्यापूर्वी नवीन विंधनविहिरी खोदणे, पाईपलाईन बदलणे, तरंगत्या लोकसंख्येचा विचार करून पाण्याची व्यवस्था करणे, प्रादेशिक योजनांची दुरुस्ती, तलावात कवठे- केंजळ, व नागेवाडी योजनेचे पाणी सोडणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.
कोंडोशीसारख्या दुर्गम गावांत अन्य टँकर जाऊ शकत नसल्याने खाजगी ऐवजी शासकीय टँकरने पाणी पुरवठा करावा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ग्रामपंचायतीशी समन्वय ठेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पाणी पुरवठा प्रस्ताव सादर करावेत, अभ्यास करून योजनांचे प्रस्ताव व अमंलबजावणी करावी अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या होत्या. संजय गायकवाड यांनी कोयनाकाठच्या गावात नदीऐवजी विहिरीवरून पाणी पुरवठा प्रस्तावित करावा, पर्यावरणदृष्टया संवेदनशील असल्यामुळे डोंगरमाथ्यावरील विंधनविहिरी 250 फुटांपेक्षा अधिक खोल घेण्यास परवानगी मिळावी, व टंचाई प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली. अश्या पद्धतीच्या बैठकीत चर्चा होवूनही त्या कागदोपत्री राहिल्याचे चित्र वाई विधानसभा मतदार संघात दिसत आहे. तरी दुष्काळाची भीषणता लक्षात घेवून मागेल त्या गावाला टँकर मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular