सातारा :- कास धरणातील पाणीसाठा दहा फुटावर आल्याने नियोजन सातारा शहराच्या नागरिकांना पिण्याचे पाणीपुरवठा करणारा 22 किलोमीटर अंतरावरील कास तलावात आता दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.त्यामुळे भविष्यात सातारा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता ओळखून आता सातारा पालिकेने येत्या सोमवारपासून एक दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यादृष्टीने पालिकेने शहरातील पाणी वितरणाच्या प्रकारात आठ भाग करण्यात आले आहेत. व त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कास आणि शहापूर योजनेचा पाणीपुरवठा आता आठवड्यातून एकदा पावसाळ्यापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी दिली.गेल्यावर्षी कास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचवीस फूट पाणी पातळी निर्माण झाली होती.,
रोजच्या पाणी वापरामुळे दररोज ही पाणी पातळी एक ते दीड इंच आणि कमी होत आहे. सध्या कास धरणातील पाणीसाठा साडे10 फुटांवर आला आहे. शहापूर योजनेचे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. संभाव्य पाणीटंचाई आणि दुरुस्ती कामे विचारात घेऊन प्रत्येक भागात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान ,नळांना इलेक्ट्रीक मोटारी लावल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे.यापुढे न लावलेल्या मोटारी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नारकर यांनी दिली.