फलटण ःखंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्यासाठी वरदान ठरत असणारा नीरा देवधर प्रकल्प जो पक्ष पूर्णत्वास नेईल त्याच्या बरोबर आम्ही येऊ असे मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी इस्लामपूर तालुका माळशिरस येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्तिथी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी माजी पदाधिकारी उपस्तीत होते.या बाबत अधिक माहिती अशी की लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा महत्वाकांक्षी असलेला नीरा देवधर प्रकल्प हा पूर्ण करण्यासाठी लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सर्वपक्षीय नेते मंडळींना एकत्र करत नीरा देवधर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. त्या संघर्ष समिती मार्फत नीरा देवधर साठी मोठा संघर्ष उभा केला आहे. त्या संघर्षाला यश मिळण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जो पक्ष हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करेल त्याच्या बरोबर राहण्याचे आश्वासन दिले आहे. जर भाजपा सरकारने या प्रकल्पच्या दृष्टीने सकारात्मक विचार केला तर तर आगामी काळात भाजपाचा गुलाल उचलायला आपण तयार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष मत रणजितसिंह यांनी दर्शवले.नीरा देवधर प्रकल्पासाठी जर भाजपने सकारात्मक विचार केला तर लवकरच फलटण तालुक्यासह जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलण्यास भाजपाला नक्की यश लाभेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.