म्हसवड : कुकुडवाड परिसरात लांडग्यांनी धुमाकूळ घातला असून आज सकाळी राधूबाईचा मळा या वस्तीवर चार लांडग्यांनी शेळ्यांवर करून चार शेळ्या फस्त केल्या असून एक शेळी जखमी केल्याने शेतकर्यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी चांगदेव विठोबा काटकर यांनी केली आहे.
कुकुडवाड परिसरात लांडग्यांनी धुमाकूळ घातला असून इतर गांवामधील शेळ्या व भांड्यावर हल्ला करून अनेक शेतकर्यांचा नुकसान केले असल्याने या लांडग्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात होती. मात्र संबंधितांनी या कडे दुर्लक्ष केल्याने लांडग्यांचा धुमाकूळ सुरू आहे.
सोमवारी सकाळी कुकुडवाड येथील शेतकरी चांगदेव विठोबा काटकर यांच्या राधूबाई नावाच्या शिवारात चार लांडग्यांनी शेळ्यांवर हल्ला केला असता यामध्ये चार शेळ्या फस्त केल्या असून एक शेळी जखमी केली असून शेतकर्यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वनविभागाने वनक्षेत्रपाल यांचेकडे चांगदेव काटकर यानी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे.