Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीपर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज :- एकनाथजी ओंबळे

पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज :- एकनाथजी ओंबळे

मेढा ( वार्ताहर ) नागरीकांनी ठरवले तर ऑक्सिजनची सुविधा मिळवणे सोपे असून याकरीता पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे असे मत सातारा जावली शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथजी ओंबळे यांनी व्यक्त केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मौजे वरोशी येथिल नेहरू युवा मंडळ यांनी वरोशी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळीने नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष तथा वरोशी गावचे उपसरपंच संदिप कासुर्डे, माजी सरपंच संतोष कासुर्डे, नाना जांभळे, नंदकुमार चिकणे, आशिष ओंबळे, विकास कासुर्डे, पार्थ चिकणे, सखाराम कारंडे, अमर देसाई तसेच नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नेहरू युवा मंडळ वरोशी यांनी सुमारे ५०० वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून या मंडळाने आतापर्यत दोनशे झाडांची लागवड केली असून यामध्ये वड, पिंपळ, कवट, बेल, कडूलिंब, चिंच, करंज आदीचा समावेश आहे. कोरोनाकाळात रुग्णास ऑक्सिजनची गरज भासत आहे, त्याकरीता
ऑक्सिजन प्लांट उभा करावा लागत आहे आपण ठरवले तर ऑक्सीजनची बचत आपण करू शकतो त्याकरीता निसर्गसंपत्तीचे रक्षण करणे काळाची गरज आहे व तीचे संगोपन करणे महत्वाचे ठरणार असून सर्वांनीच या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular