साताराः आजच्या घडीला शिक्षण हा एकमेव पर्याय मानवाला प्रगतीपथावर नेवू शकतो. शिक्षण घेत असतानाच आपणाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्तिच केले पाहिजे. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहण्यासाठी चांगली संगत बाळगली पाहिजे. करिअर निवडताना आपली मानसिक तयारी तर हवीच पण, घरची आर्थिक परिस्थिती पाहून योग्य करिअरची निवड करावी, असे मत ख्यातनाम शिक्षण आणि शिक्षकतज्ञ डॉ. दिलीप देशमुख (एम.एस.सी.,एम.एड., बी.जे.,ए.व्ही.पी.एम. फिल.,पीएच.डी) यांनी केले.
10 वी आणि 12 वी नंतर काय? हा यक्ष प्रश्न प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला सतावत असतो. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शिवेंद्रसिंहराजे होते. यावेळी मिलिंद सोसे (बी.टेक. एमबीए.) आणि चेतन दिवान (एमएसडब्ल्यू, एमफिल पीएचडी) या मार्गदर्शकांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सातारा सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, प्रा. जगदाळे सर, खाजगी शाळा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे यांच्यासह विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र मंडळ पुणे विद्यापिठ, टिळक महाराष्ट्र विद्यापिठ, एस.एस.सी.बोर्ड, आय.आय.ई., बालभारती, एम.एस.सी.आर.टी., बीए आरसी (मुंबई), टिएफआयआर, नॅशनल ओपन स्कूल (दिल्ली), भारतीय जैन संघटना, एआयएम, डि.वाय. पाटील शिक्षण संस्था, झील इंजिनियरिंग, दिशा अकॅडमी, एमकेसीएल, एक्सेल ग्रुप, हस्ती पब्लीक स्कूल आदी संस्थांमध्ये शिक्षक तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणार्या आणि अनेक देशांतमध्ये विविध संस्थांना शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करणार्या डॉ. देशमुख यांनी विविध मुद्यांना हात घालून विद्यार्थ्यांना भवितव्य घडवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याचे सखोल मार्गदर्शन केले. व्यसनापासून दूर राहतानाच आपल्याला जे आवडते त्यातच करिअर केले पाहिजे. ठरवलेले साध्य करण्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट केले पाहिजेत. शेवटी काहीही झाले तरी, कष्टाचे फळ हे मिळतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून ते साध्य करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. मात्र अपयशाने खचून न जाता प्रत्येक संकटाचा सामना केला पाहिजे. आत्महत्या हे कोणत्याही संकटाचे समाधान होवू शकत नाही, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
कार्यक्रमात मिलिंद सोसे (बी.टेक. एमबीए.) आणि चेतन दिवान (एमएसडब्ल्यू, एमफिल पीएचडी) यांनीही मार्गदर्शन केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनीही आपल्या शैक्षणिक जीवनातील गोड आणि कटू आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वझिर ग्रुपचे अजय माळवदे, सुर्यकांत मोरे, राजेश जंगम, नितीन स्वामी, किरण पवार, किशोर दडस आदींनी परिश्रम घेतले.
मानसिक तयारी व आर्थिक परिस्थिती पाहून योग्य करिअर निवडाः डॉ. दिलीप देशमुख
RELATED ARTICLES