Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्हा परिषदेच्या बदल्या पारदर्शक झाल्याने कर्मचार्‍यांना मिळाला न्याय

सातारा जिल्हा परिषदेच्या बदल्या पारदर्शक झाल्याने कर्मचार्‍यांना मिळाला न्याय

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सत्तेच विकेंद्रीकरण व्हावे यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निर्मिती केली. काही काळ सत्तेच विकेंद्रीकरण झाले. पण,काही ठिकाणी घराणेशाहीच रोपटे उभे राहिले. त्यामुळे याठिकाणच्या कर्मचार्‍यांना पदोन्नती व बदलीमध्ये अन्याय सहन करावा लागत होता. परंतु आता देशभर राजकीय हालचालीला वेग आल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या बदल्या पारदर्शक झाल्याने अनेक कर्मचार्‍यांना न्याय मिळाला आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये सुमारे बाराशे अधिकारी -कर्मचारी काम करीत आहेत. ग्रामसेवक व शिक्षक यांचीही संख्या चार आकडी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बदल्यांकडे अनेकजण नजर ठेवून असतात. तसेच राजकीय वशीलेबाजी, प्रस्थापित अधिकार्‍यांना खुश ठेवणे , जि. प. कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी यांच्याशी मैत्रीपूर्ण इमाने इतबारे संबंध ठेवून कर्मचार्‍यांना काम करावे लागते. त्यामुळे दरवर्षी जुन महिन्यात बदलीसाठी प्रयत्न सुरू करावे लागतात. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासन, ग्रामपंचायत, कृषी, अर्थ, बांधकाम, आराग्य, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागात सुमारे 200 कर्मचार्‍यांच्या बदल्या होवू घातल्या आहेत. या बदलीमध्ये यापूर्वी अन्याय झालेल्या कर्मचार्‍यांना न्याय व दिलासा देण्याचे काम सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता केले आहे. उलट कर्मचार्‍यांनी शिस्तीचे पालन करावे, यासाठी बदलीचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कोणतेही कुचराई केलेली नाही. याचे सर्वत्र समाधान होत आहे. यापूर्वी अनेकदा बदल्यामध्ये उघडपणे वशिलेबाजी होऊन अनेकांनी मलिदा लाटला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, विषय समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व इतर पदाधिकारी यांनी या बदल्यांमध्ये पारदर्शकता असावी. कोणत्याही बदली झालेल्या कर्मचार्‍यावर पूर्वी जसा अन्याय होत होता तसा अन्याय होऊ नये, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रामाणिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांना न्याय मिळाला आहे. सबका साथ – सबका विकास, हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना न्याय देणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या पाठिशी सातारची जनता निश्‍चितच राहिल, असा विश्‍वास सातारा जिल्हा परिषदेमध्ये सेवा देवून निवृत्त झालेल्या प्रामाणिक कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सध्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बदल्यामध्ये कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी अफवेवर विश्‍वास ठेवू नये. असे संबंधितांनी स्पष्ट केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular