साताराः अल्पसंख्याक हक्क दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नाविषयी सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. शासनाची विविध खाती यासाठी पुढाकार घेत आहेत. नुकतीच सातारा येथे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अल्पसंख्याक समाजातील मुला मुलींच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती , मोफत गणवेश वाटप, शिक्षक नियुक्ती या अनुषंगाने चर्चा झाली.
ही बैठक सातारा जिल्हा परिषदेच्या जलस्वराज्य हॉल येथे आयोजीत केली होती. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. जलस्वराज्य हॉल हा सामाजिक कार्यकर्ते , स्वयंसेवी संघटना , विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी फुलून गेला होता. सुरुवातीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी स्वागत करून या बैठकीमागची शिक्षण विभागाची भूमिका मांडली. यानंतर शिक्षणाधिकारी (निरंतर) मगदूम आणि उपशिक्षणाधिकारी महामुनी यांनी विविध योजनांचे सादरीकरण केले.उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर ऊपस्थित होत्या.
सादरीकरणावर उपस्थितांनी असंख्य प्रश्नाचा अक्षरशः भडीमार केला. सातारा जिल्ह्याच्या वाट्याला मागील तीन वर्षात जेमतेम शिष्यवृत्त्या वाट्याला आल्या आहेत. हे प्रमाण राज्याच्या एकूण शिष्यवृत्त्यांच्या अर्धा टक्के इतके देखील नाही हे निदर्शनास आल्यावर कार्यकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑनलाइन फॉर्म भरताना येणार्या अडचणी , फॉर्म भरण्याची पद्धतीविषयी शाळांना स्पष्टता नसणे , उत्पन्नाच्या दाखल्यासाठी होणारी अडवणूक , शाळा प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष अशा अनेक अडचणी समोर आल्या. ज्या शाळांचे शिष्यवृत्त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत अशा शाळांवर कारवाई करण्याचे शिक्षणाधिकार्यांनी आश्वासन दिले. शिष्यवृत्तीचे अर्ज वेळेवर आणि व्यवस्थित भरले जावेत यासाठी पुढील वर्षी तालुकानिहाय बैठका घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या उपस्थिती भत्त्याविषयी नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
त्याचबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम व एकूण शिकणार्या मुलांच्या प्रमाणात शिष्यवृत्तीची तरतूद अगदीच तुटपुंजी आहे. ती वाढवण्याची मागणी करण्यात आली. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातून शिकणार्या मुलांसाठीच्या शिष्यवृत्त्यांसदर्भातही अनेक अडचणी व गैरसमज असल्याचे दिसून आहे. बर्याच ठिकाणी महाविद्यालये या योजनांकडे दुर्लक्ष करतात. चुकीची माहिती देतात. फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतात. त्यांना स्वतःलाच पुरेशी माहिती नसते.त्यांच्या जबाबदारीची जाणीव नसते. अशा अडचणींसंदर्भात उपसंचालक यांच्यासोबत बैठक लावण्याचे ठरले .उर्दू शाळांचा दर्जा सुधारण्याची त्याचे आधुनिकीकरण होण्याविषयी कोणालाच शंका नाही. परंतु त्यासाठी उर्दू माध्यमाचा किमान एक शिक्षण विस्ताराधिकारी असावा याची 2012/13 पासून मागणी करूनही अद्याप अधिकारी मिळू शकलेला नाही. त्यामुळे उर्दू शिक्षणाच्या दर्जाचे किंवा त्यातील अडचणींचीही शासन दरबारी पोहोचू शकत नाहीत.
डलहशाश षेी खपषीर्रीींीीर्लींीीश ऊर्शींशश्रेिाशपीं ळप चळपेीळींू खपीींर्ळींीींशी (खऊचख) ,म्हणजेच अल्पसंख्याक संस्थांचा पायाभूत विकास आणि डलहशाश ींे र्झीेींळवश र्टीरश्रळींू एर्वीलरींळेप ळप चरवीरीरी (डझटणएच्) म्हणजे मदरसा आधुनिकीकरण या दोन्ही योजना शासकीय पातळीवरून घोषित झाल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. अल्पसंख्य समाजाच्या शिक्षणासाठी पायाभूत सुविधा देण्यासाठीच्या तरतुदी असूनही प्रस्ताव पुढे जात नाहीत. जिह्यातील असे प्रस्ताव पडून राहतात याच्याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले.
दरम्यान उपस्थिती भत्ता वितरण व व्यावसायिक कौशल्य विकासाबद्दल माहिती मिळू शकली नाही. जवळपास दोन तासांच्या जोरदार चर्चेनंतर मार्च महिनाखेरीस पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्याचे ठरले.आजच्या या बैठकीला अल्पसंख्याक समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये प्रामुख्याने सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेचे गुलाब शेख , इकरा एज्युकेशन ट्रस्ट चे संचालक अहमदभाई कागदी ,अंजुमन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक असिफ बेद्रेकर , मुस्लिम जागृती अभियानाचे मुझफ्फर सय्यद , तौसिफ शेख , आरिफ शेख ,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष विजय मांडके , मुस्लीम ओबीसी संघटनेचे राशीदभाई बागवान , छावा कार्यकारी जिल्हाध्यक्ष रफिक शेख , तसेच शिकलगार संघटनेचे झाकीर शिकलगार , सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या रझिया शेख , इरफान बागवान , मायनॉरीटी डेव्हलपमेंट सेन्टरचे इरफान सय्यद , राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीक भाई, सादिक शेख , मिनाज सय्यद, आरीफभाई बागवान व अल्पसंख्याक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे अनिल मोहिते , जयंत उथळे , कॉ. सलीम अत्तार यांनीही बैठकीत सहभाग घेतला.
मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नावर जिल्हा परिषदेत बैठक
RELATED ARTICLES