भुईंज : सहकार व राजकारणाला अध्यात्माची जोड असेल तर उत्तम समाजकारण होते. संत साहित्य, संतांचे विचार, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व लोकजागरण होण्यासाठी किसन वीर साखर कारखान्याने गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू केलेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्यास कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद लाभला. हा अखंड नामयज्ञ सोहळा यंदा 16 व्या वर्षीही 22 ते 25 जानेवारीअखेर नामवंत कीर्तन-प्रवचनकार, थोर संत साहित्यीक, अभ्यासक, उपासक, साधक-भक्तभाविक आणि वारकर्यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. मंगळवारी (दि.22) सकाळी साडे दहा वाजता ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नामयज्ञ सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, मंगळवार दि. 22 जानेवारीला सकाळी 8 वाजता कलश पुजनानंतर निघणार्या ग्रंथदिंडीत विविध वारकरी संघटना व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता बिबवी, मेढा येथील ह. भ. प. आबामहाराज देशमुख यांच्या प्रवचनानंतर सात वाजता वेळू ता. कोरेगाव येथील ह. भ. प. संजयमहाराज वेळूकर यांचे कीर्तन होणार आहे.
बुधवार दि. 23 रोजी दुपारी तीन वाजता प्रमोद निंबाळकर, नितिन भंडारे, ज्ञानेश्वर गवरे व मयुर शिंदे यांचा मृदृंगवादनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजता निशाद पवार व रूपक पवार यांची तबला जुगलबंदी रंगणार असून सायंकाळी सात वाजता बीड येथील ह.भ.प. महादेवमहाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे. गुरूवार दि.24 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथील सौ. कल्याणीताई मोरे-धावले यांच्या प्रवचनानंतर नयनरम्य दिपोत्सवाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजता भोसलेवाडी (जेजुरी) पुणे येथील ह. भ. प. कु. नेहाताई भोसले यांचे कीर्तन होणार आहे. गुरूवार दि. 25 जानेवारीला सकाळी 8 वाजता पालखी सोहळ्यानंतर श्री क्षेत्र आळंदी येथील ह. भ. प. श्री. महंत पुरूषोत्तमदादामहाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसाद होऊन नामयज्ञ सोहळ्याची सांगता होणार आहे.
सोहळ्याचे व्यासपीठ ह. भ. प. चंद्रकांतमहाराज उदावंत चालविणार असून दररोज सकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या पारायणासह चिंतन, सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री दहानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावांच्या भजनी मंडळाचा जागर होणार आहे. सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक वस्तु, धार्मिक ग्रंथ, संत साहित्य व धार्मिक कॅसेटच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
चार दिवस चालणार्या अखंड नामयज्ञ सोहळ्यात कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद, विविध वारकरी संघटना, भजनी मंडळे, कार्यकर्ते व भाविकांनी उपस्थित राहून या संत स्नेह मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व संचालक मंडळाने केले आहे.
किसनवीर कार्यस्थळावर 22 जानेवारीपासून नामयज्ञ सोहळा
RELATED ARTICLES