सातारा : सुमारे चारशे वर्षांची किर्तन परंपरा लाभलेल्या घराण्यात जन्म घेउन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. गोविंदस्वामी आफळे यांचे सुपुत्र असलेल्या ह.भ.प. चारुदत्त बुवांनी आपल्या ओघवत्या वणाीने राष्ट्राची किर्तन परंपरा भव्य दिव्य केली. देखणे व्यक्तीमत्व असलेले व तितकाच कंठ गोड असणारे चारुद्त्त हे राज्याचे नव्हे तर देशाचे वेैभव आहेत असे गौरवोद्गार श्री गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी काढले
समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यावतीने सन 2018 चा समर्थ संत सेवा पुरस्कार आजचे आघाडीचे कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांना लोकमान्य सभागृह केसरी वाडा पुणे येथे प्रदान करण्यात आला यावेळी मार्गंदर्शन करताना गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर बोलत होते.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे समारंभाचे अध्यक्षहोते,तसेच मंडळाचे कार्यवाह स.भ. मारुतीबुवा भोसले रामदासी , समर्थं भक्त योगेश बुवा रामदासी, सौ.शुभांगी आफळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
समारंभाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्लन क रुन झाली त्यानंतर वेदमूर्ती वझे गुरुजी यांनी वेद मंत्र म्हणत वेदोक्त आशिर्वाद दिले. तर सरस्वती स्तवन दिपा भंडारे यांनी केले. सर्व मान्यवरांचा सत्कार व स्वागत योगेशबुवा रामदासी, श्रीराम सबनीस, अरविंद बुवा अभ्यंकर, सौ.कल्पना ताडे यांनी केला.
त्यानंतर मधु नेने यांनी ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे यांचा परिचय करून देत सर्वाचे स्वागत केले. मानपत्राचे वाचन दिपा भंडारे यांनी केल्यावर समर्थं भक्त मारुतीबुवा रामदासी व शंकर अभ्यंकर यांचे हस्ते आफळे बुवांना सातारी कंदी पेढ्यांचा हार, रु. 21 हजार, मानचिन्ह, मानपत्र व महावस्त्र देउन पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी आफळे बुवांच्या सुविद्य पत्नी सौ.शुभांगी आफळे यांचाही सत्कार साडी, पुष्पगुच्छ व श्रीफळ देउन समर्थं विद्यापीठाच्या उपकुलसचिव सौ. प्राची भिडे यांनी केला.
उपस्थितांना मागर्ंदर्शन करताना विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील संस्कृतीतला हा मोठा आनंदाचा क्षण आहे. किर्तन भास्कर नव्हे तर किर्तनातील पूर्ण चंद्र असणारे चारूदत्त यांनी आपल्या किर्तनातून संस्कृतीचा समृध्द वारसा पुढे नेला. आपल्या संत परंपरेत संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम व समर्थ रामदास हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. त्यंानी दिलेले मोठे वैभव ज्याला तोड नाही असे आहे. राष्ट्रभक्ती आपल्या किर्तनातून सर्वस्पर्शी साधणारे आफळे कुटूृंब खूप मोठे आहे. आपल्याला लाभलेली समृध्द किर्तन परंपरा पाच प्रकारात येते. यामध्ये हरिदासी किंवा नारदीय, वारकरी, रामदासी, दासगणू व संत गाडगे महाराजांची गोपाला गोपाला ही परंपरा ज्यामुळे आपली संस्कृती समृध्द झाली. राष्ट्रीय किर्तनकार गोविंदस्वामी आ फळे यांची रोमांच आणणारी किर्तने आजही आठवतात. त्यामध्ये 100 पावले पुढे जात अभ्यास व संशेाधन करत चारूदत्तने समाज प्रबोधनासाठी किर्तनाचा उपयोग केला. किर्तनात दशकलांचा समावेश असतो. किर्तन करणे सोपे नाही. त्यासाठी सदगुण परिश्रमपूर्वक धारण करावे लागतात.
चारही चर्तुवेदाचा मतितार्थ त्यांनी किर्तनातून उलगडून दाखवण्याचे वैशिष्टय साधले आहे. चारूदत्त यांनी ही परंपरा देशातच नव्हे तर परदेशातही किर्तनाचा भगवा ध्वज उंच उभारत हिंदूच्या पुढील पिढयांना आपला धर्म समजावून ोंगण्याचे कार्य मोठया जिद्दीने करित आहे हे खूप अभिनंदनीय आहे. असा हा समाज प्रबोधन करणारा किर्तनकारक खूप मोठा आहे.
सत्काराला उत्तर देताना चारूदत्त बुवा म्हणाले की, समर्थ वाडमयाची सेवा पिढयानपिढया करण्याची ांणी आफळे कुटूंबाला मिळाली.1953 साली श्रीधर स्वामींच्या पुढे बाबांनी सादर केलेले किर्तन प्रथम क्रमाकांचे ठरले त्याचे साक्षीदार समर्थभक्त मारूतीबुवा हे आजही मला आशिर्वाद द्यायला इथे हजर आहेत. हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
माझ्या बाबांनी लक्षावधी लोकांना किर्तनातून भावविश्वात नेले. त्यांचे एवढे प्रसंग उभा करण्याची कला मला आजही जमत नाही. त्यांनी सादर केलेले स्वातंत्र्य संग्रामांचे प्रसंग लोक 50 वर्षे झाली तरी विसरत नाहीत. समर्थ वाडःमयाची सेवा पुढे नेण्याचे काम माझे हातून असेच सुरू राहो व किर्तन समृध्द करण्याची शक्ती तुम्हा सर्वाकडून मला मिळो.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे म्हणाले की, संतांच्या मार्गदर्शन विचारांचे प्रबोधन व्हावे म्हणून मान्यवर व्यक्तींना प्रतिवर्षी हा पुरस्कार देवून गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे तेरावे वर्ष असून यापूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, प्राचार्य राम शेवाळकर, शंकर अभ्यंकर, स्वामी गोविंददेव डॉ. यशवंत पाठक, सुनील चिंचोलकर आदी मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.समर्थाच्या विचारांना आपल्या किर्तनातून समाजापर्यत पोहचवण्याचे काम करणार्या आफळेबुवांची या साठी केलेली निवड ही अतिशय सार्थ आहे.
समारंभाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व सज्जनगड मासिक पत्रिकेेचे कार्यंक़ारी संपादक मधु नेने यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीराम सबनीस यांनी केले. सामुदायिक कल्याणकारी रामराया या प्रार्थनेने सोहळयाची सांगता झाली.
समारंभास मंडळाचे बाबाा बलशेटवार, गणपतीबुवा रामदास, भास्कर मेहेंदळे, मोहन साठे, बबनराव सापत,े श्री.भंडारे, श्री.साखरे, रवि ताथवडेकर, सौ. जयश्री कुलकर्णी, राजू कुलकर्णी आदींसह संपूर्ण राज्यातील समर्थभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
किर्तनकार ह.भ.प.चारूदत्त आफळेबुवा हे देशाचे वैभवः शंकर अभ्यंकर
RELATED ARTICLES