भुईंज : राज्यातील असंख्य शेतकरी वर्गाशी शासकीय अधिकारी म्हणून माझा जवळून संबंध आला. त्यांची अभ्यासूवृत्ती, शेतीमधील प्रयोगशीलता वाढावी तसेच त्यांचे जमिनीसंदर्भातील वाद मिटावेत, यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर किसन वीर कारखान्यावरील प्रकल्प पाहिल्यानंतर किसन वीर हा एक साखर उत्पादन करणारा कारखाना नसून शेतकरी हिताची आदर्शवत यशस्वी प्रयोगशाळा आहे. येथील प्रयोग पाहिले आणि शहरातील सद्यस्थिती पाहिली तर शेतीकडे चला हा मंत्र आत्मसाद करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग,जिल्हा परिषद कृषी विभाग आणि वाई तालुका अॅग्री डिलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने किसन वीर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. सौ. निलिमा भोसले, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक राजदत्त, कोल्हापूरचे विभागीय कृषी सह संचालक दशरथ तांबाळे, जिल्हा कृषी अधिक्षक सुनील बोरकर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विनायक पवार, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, युवा उद्योजक ऋतुराज चव्हाण, डॉ. सौ. सुरभि भोसले-चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर गायकवाड पुढे म्हणाले, ग्रामीण भागातून शहराकडे गेलेला लोंढा पाहता त्यांना परत शेतीकडे वळविणे ही काळाजी गरज बनलेली असून यासाठी शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणे गरजेचे आहे. किसन वीरचा परिसर व विविध प्रकल्प पाहिल्यानंतर आगामी काळात राज्यातील इतर कारखान्यांनी आदर्श घ्यावा व येथील शेतकरी हिताचे प्रकल्पांची सर्व कारखान्यांनी राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मदनदादा भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षात चोवीस हजार फळ झाडांची लागवड करण्यात आलेली असून अखंड नामयज्ञ सोहळ्याच्यानिमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनातून कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाने भरघोस कृषी उत्पन्न घेण्यास ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे सांगितले.
प्रारंभी सकाळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कोल्हापुर विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. सौ. निलिमा भोसले, जिल्हा कृषी अधिक्षक सुनील बोरकर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विनायक पवार, कृषि उपसंचालक विजय राऊत, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषतज्ञ रासकर, शेतकरी, वारकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचार्यांच्या हस्ते अवघ्या दहा मिनिटात ङ्गवृक्ष वल्ली आम्हा सोयरे…फ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाच्या गजरात कार्यस्थळावरील को जन परिसरात आंब्याच्या एक हजार रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे यांच्या हस्ते बायोकंपोस्ट सेंद्रीय खत निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला. तदनंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड, दशरथ तांबाळे, राजदत्त, मदनदादा भोसले, गजानन बाबर आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सर्व मान्यवरांनी कृषि प्रदर्शनाची पाहणी केली. कारखाना व शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सुरभि भोसले-चव्हाण यांच्या हस्ते आणि डॉ. सौ. निलिमा भोसले, कारखान्याच्या संचालिका सौ. विजया साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पुष्प प्रदर्शनात मांडण्यात आलेली रंगीबेरंगी फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सर्व मान्यवरांनी पुष्प प्रदर्शनाचीही पाहणी केली. मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. सुत्रसंचालन शिला जाधव- शिंदे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, सयाजी पिसाळ, प्रकाश पवार-पाटील, अरविंद कोरडे, प्रविण जगताप, विजया साबळे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, तालुका कृषी अधिकारी एच. डी. धुमाळ, अरूण आदलिंगे, अॅड. प्रतापसिंह देशमुख, अमर धुमाळ, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, वाई तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल डेरे, किशोर बाबर, केशव पिसाळ, शेखर भोसले पाटील, हणमंत गायकवाड, दत्तात्रय शिंदे, मनोज भोसले, अशोक बाबर, शेतकरी, वारकरी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतीकडे चला हा मंत्र आत्मसात करणे आवश्यकः शेखर गायकवाड
RELATED ARTICLES