केळघर:भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून या प्रक्रियेत मतदारांना सुलभ नावनोंदणी, मतदान करता यावे. यासाठी निवडणुक आयोग विविध उपक्रम राबवत आहे. याचा लाभ नागरिकानी घेऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी मंडलाधिकारी पी .एम. कुलकर्णी यांनी केले.
श्री. भैरवनाथ विद्यामंदिर केळघर (ता.जावली) येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच रविंद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, स्कूल कमेटी सदस्य राजेंद्र गाडवे, मुख्याध्यापिका ए.पी. बिडवे, बी.एल.ओ.जयश्री बेलोशे, लिला सल्लक, वंदना शिनगारे, राघव बिरामणे, शिवाजी चव्हाण, प्रथमेश शिंदे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पी.एम. कुलकर्णी म्हणाले, 25 जानेवारी हा निवडणुक आयोगाचा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात जवळपास 87 कोटी मतदार तर 10 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्र असून या सर्वाच्या सोयीसाठी व अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला तसेच दिव्यांग मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे. यासाठी निवडणुक आयोग विविध उपक्रम राबवत आहे. याचा लाभ घेऊन 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी गावातीत मतदार केंद्रस्तरीय अधिकार्यांशी सपंर्क साधावा. किंवा ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
यावेळी सूर्यकांत देवकर यांनी मतदान करणेबाबतची प्रतिज्ञा वदवून घेतली. तर मतदार साक्षरता क्लबचे सचिव माने बी.बी.यांनी स्वागत केले. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मतदार नाव नोंदणी अभियानात लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा: कुलकर्णी
RELATED ARTICLES