सातारा : (एकनाथ थोरात) सामाजिक बांधिलकी जपणे ही अमर सायकल एजन्सी ची परंपरा आहे. आणि यातूनच अजून एक पाऊल उचलले ते म्हणजे खटाव तालुक्यातील चितली गावातील नव महाराष्ट्र विद्या मंदिर या शाळेला मुंबई च्या एम्पथी फाऊंडेशन आणि वर्धमान एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ना नफा ना तोटा तत्वावर 111 सायकली भेट दिल्या.
गावातील गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
वितरणाचा कार्यक्रम उद्या 26 जानेवारी रोजी माजीःपोलीस अधिकारी रामराव पवार यांच्या हस्ते शाळेच्या मैदानात होणार आहे. तसेच अमर एजन्सीचे मालक अशीष जेजूरीकर यांनी शाळेला आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
अमर सायकल एजन्सीतर्फे ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चितळी शाळेला 111 सायकलींची भेट
RELATED ARTICLES