भुईंजः भुईंज येथे हिंदु धर्मातील सर्वश्रेष्ठ ऋषी आचार्य भृगूमहाराज यांचे समाधी स्थळावर 41 वे ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा अंतर्गत प्रवचनाऐवजी सुरू केलेली ज्ञानसत्र कृष्णाकाठावरील हि व्याख्यानमाला सोमवार दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता विश्वचैतन्य प.पू.श्री.सदगुरू नारायण महाराज ह्यआण्णाहृ यांचे उपस्थितीत सुरू होणार असून यावेळी संत साहित्यीक मा.सौ.स्वाती घोरपडे गोजेगावकर यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सरपंच ग्रामपंचायत भुईंजच्या सौ.पुष्पा अर्जुन भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी साताराचे युवराज पाटील उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दिनांक 5 फेबु्रवारी युवा शिवव्याख्याते बार्शीचे मा.श्री.खंडू डोईफोडे यांचे व्याख्यान तर अध्यक्षस्थानी चेअरमन भुईंज विकास सेवा सोसायटीचे एम.आर भोसले तर प्रमुख उपस्थिती विभाग नियंत्रक एस.टी.महामंडळ साताराचे सागर पळसुले असणार आहेत. दिनांक 6 फेबु्रवारी रोजी अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ सातारा हरीष पाटणे यांचे व्याख्यान तर अध्यक्षस्थानी चेअरमन किसनवीर उद्योग समूहाचे मदनदादा भोसले तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधिक्षक सातारा पंकज देशमुख असणार आहे. गुरूवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध लेखक संदिप चव्हाण व्याख्याण तर अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब जाधवराव तर प्रमुख पाहुणे तहसिलदार वाईचे रमेश शेंडगे उपस्थित असणार आहेत. शुक्रवार दिनांक 8 फेबु्रवारी रोजी अध्यक्ष वाई तालुका पत्रकार संघ मा.विश्वास पवार यांचे व्याख्याण यावेळी अध्यक्षस्थानी वाई पंचायत समिती सभापती मा.सौ.रजनी भोसले असणार आहेत तर प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी वाईच्या श्रीमती संगिता चौगुले राजापूरकर यांची उपस्थिती असणार आहे. शनिवार दिनांक 9 फेबु्रवारी रोजी प्रमुख वक्त्या ब्रम्हकुमारी श्रीमती बहन यांचे व्याख्यान होणार असून यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँंगे्रसचे प्रतिनिधी मोहनराव उर्फ आबासाहेब भोसले उपस्थितीत राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी पंचायत समिती वाईचे उदयकुमार कुसुरकर उपस्थित असणार आहेत. रविवार दिनांक 10 फेबु्रवारी रोजी ह.भ.प.शंकर महाराज मोरे व्याजवाडी यांचे काल्याचे किर्तन होईल.
दररोज संध्याकाळी 9 ते 11 यावेळेत किर्तन महोत्सव होणार असून दिनांक 7 फेबु्रवारी 2019 रोजी होर्णाया प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे.
दररोज पहाटे 4.30 ते 6 वाजता काकड आरती़ सकाळी 8 ते 12.30 वा.पर्यंत श्री.ज्ञानेश्वरी पारायण़ दुपारी 1 ते 2 भजऩ दुपारी 3 ते 4 वा.व्याख्यानमाला तसेच सांयकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 हरिकिर्तन असणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
भुईंज येथे सोमवार दिनांक 4 फेब्रुवारी पासून अखंड हरीनाम सप्ताह व व किर्तन महोत्सवाचे आयोजन
RELATED ARTICLES