सातारा : सातार्यातील ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या 40 सुरक्षा रक्षकांचे सुमारे 42 लाखाचे वेतन गेले 8 ते 10 महिने मिळाले नाही. त्यामुळे कर्मचार्यांवर उपासमारी वेळ आली आहे, आत्महत्याची वेळ आली आहे. आठ दिवसात कर्मचार्यांचे थकीत वेतन मिळाले नाही तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. दरम्यान कागद पत्राच्या खेळात वेतन अडकल्याची माहिती समोर आली आहे.
लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 10 महिन्यापासून थकीत वेतन मिळविण्यासाठी पाटण व सातारा वगळता इतर शामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना संघर्ष करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यात खेड्यापाड्यातील ग्रामीण रूग्णालयात दिवस रात्र सेवा देणार्या 40 सुरक्षा रक्षक सातत्याने वेतन मागणीसाठी शासकीय रूग्णालय व सुरक्षा रक्षक बोर्डाकडे पाठपुरावा करीत आहेत. सध्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांची सव्वा लाख रुपये याप्रमाणे 42 लाख रुपये देयक आहे. हे देयक सव्याज मिळावे अशी मागणी सुरक्षा रक्षकांच्यावतीने लोकजनक्ती पार्टीेने केली आहे. याबाबत दिरंगाई झाल्यासजिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा प्रशासन यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा शुन्हा दाखल केली जाईल आणि या सर्व गोष्टीला जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय जबाबदार राहील. यापुढे लोकशाही मार्गाने थकीत वेतन मागणयांची आमची मर्यादा संपलेली आहे. त्यामुळे दि. 10 फेब्रुवारी पर्यंत वेतन मिळाले नाही तर लोकजन शक्ती पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबासह तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
दरम्यान सांगली जिल्हा सुरक्षा मंडळाने दि. 28 ऑगस्ट 2017 रोजी जिल्हा शल्य चिकित्सन यांना सुरक्षा रक्षक यांचे वेतन नियमाप्रमाणे अदा करणेबाबत शासनाच्या बाह्य यंत्रणेव्दारे कंत्राटी पध्दतीने सेवा उपलब्ध करून घेताना अनुसरावयाच्या बंधकारक बाबींबाबत शासन निर्णय क्र./ पदनि 2512/का.12 अनुसरून दि. 19 मार्च 2014 च्या आदेशाची प्रत जोडली आहे. तसेच जिल्हा रूग्णालय सातारा यांनी सुरक्षासेवेबाबत डिसेंबर 2018 पर्यंत 10 लाख रूपये अनुदान मागणीचे पत्र 31 जानेवारी 2019 ला उपसंचालक आरोग्यसेवा पुणे मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. परंतु शासनाच्या आरोग्य सेवा उपसंचालक यांनी पाठविलेल्या प्रस्तावाबाबतच्या त्रुटींची पुर्तता करून परीपूर्ण प्रस्ताव खुलाशासह पाठविण्याचे पत्र दि. 24 जानेवारी 2019 रोजी पाठविले आहे. या कागदी खेळामुळे 40 सुरक्षा रक्षकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला असून त्यांना देयक कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर सध्या संधटनासुध्दा शोधू लागल्या आहेत.
सातार्यात 40 सुरक्षा रक्षकांचे 42 लाखाचे वेतन कागदपत्राच्या खेळात अडकले
RELATED ARTICLES