साताराः (एकनाथ थोरात यंाजकडून) संभाजीनगर ता. सातारा येथील ग्रामपंचायतीच्या विशेष शेस फंडातील 5 टक्के निधीतून एकूण 42 अपंग लाभार्थीना सन 2018-19 अंतर्गत एकूण 2 लाख 49 हजार रूपयाच्या निधीचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद झालेल्या अपंग लाभार्थीना नमुन्यातील फॉर्म वाटप करण्यात आले आहे. प्रति अपंग लाभार्थीस 5 हजार 300 रूपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात येणार आहेत. गतवर्षी प्रत्येक लाभार्थीस 10 हजार रूपये 3 टक्के निधीतून दिले जाते, यावर्षी निधीची वाढ होवून 5 टक्के निधी करूनही लाभार्थीची संख्या वाढल्याने निधीचे प्रमाण कमी झाले आहे. अशी माहिती ग्रामसेवक बनसोडे व सरपंच दिपाली पंडीत, उपसरपंच सुभाष मगर यांनी दिली.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणार्या निधीमध्ये 3 टक्क्यावरून 5 टक्के निधीची वाढ केली आहे. याबाबत अंमलबजावणी शासनाच्यावतीने नव्याने अध्यादेश जारी केला आहे. ग्रामपंचायत स्तरावर जीआर मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षण व स्टॅम्प ड्युटीवरील वसुल रक्कमेच्या 5 टक्के निधी अपंग लाभार्थीना देण्यात येतो, संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये सन 2017-18 मध्ये एकूण 28 लाभार्थीची नोंद झाली होती. त्यांना गतवर्षी 3 टक्के निधी प्रत्येक लाभार्थीस 10 हजार धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आला होता. यावर्षी सन 2018-19 मध्ये नव्याने लाभार्थीची वाढ होवून 42 वर संख्या पोहचली आहे. 2 लाख 49 हजार रूपये 5 टक्के निधीतून अपंग लाभार्थीना वाटप करण्यासाठी प्रत्येक लाभार्थीस 5 हजार 300 रूपये वाटयाल येत आहेत. लाभार्थीची संख्या वाढल्याने तसेच शिक्षण व स्टॅम्प डयुटीवरील महसूली उत्पन्न विचारात घेता निधीची वाढ होवूनही लाभार्थीच्या नशिबी कमी रक्कम मिळणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
वास्तविक प्रत्येक अपंग लाभार्थीस 15 हजार रूपये 5 टक्के निधीतून मिळावयास हवे होते, मात्र कागदी घोडे नाचविण्याच्या प्रकारामुळे अपंग लाभार्थी वाढीव निधीपासून दूर राहणार आहेत. दरम्यान, सातारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी तातडीने लक्ष पुरवून वाढीव 5 टक्के निधीचा लाभ अपंग लाभार्थीना होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
अपंग लाभार्थीच्या मिळकतीचा घरफळा 50 टक्के माफ करण्याचा शासनाने अध्यादेश जारी केला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी जिल्हयातील 1502 ग्रा.पं.मध्ये होत नाही, याबाबत जि.प.वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने आदेश काढून अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी अपंग लाभार्थी व त्यांच्या कुटूंबियांकडून होत आहे.
संभाजीनगरला अपंग लाभार्थीच्या संख्येत वाढ, पाच टक्के निधी वाढूनही अपंगाच्या पदरी निराशाच
RELATED ARTICLES