रहिमतपूर : बोरीव, ता. कोरगाव येथील युवती वर्षाराणी राजेंद्र पोळ (वय 25), हिचा विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. अशी फिर्याद तिचा भाऊ शैलैश राजेश पोळ यांने रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत रहिमतपूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वर्षाराणी व तिचा भाऊ शैलैश अपशिंगे, ता. कोरेगाव खुलगिरा नावाचे शिवारात चेंबर बंद करण्यासाठी मोटार सायकलवरून गेले होते. त्यांचे शेतावरच्या साईडला असल्याने वर्षाराणीला तिचा भाऊ शैलेशने तिला सांगितले की मी दहाच मिनिटात वरून चेंबर बंद करून येतो. तू खालच्याच शेतात थांब असे सांगून मोटर सायकलवरून चेंबर बंद करण्यासाठी गेला. तो चेंबर बंद करून दहा मिनिटांनी आल्यानंतर शैलेशने इकडे तिकडे पाहिले तर वर्षाराणी तेथे नव्हती म्हणून शैलैशने शोधाशोध सुरू केली त्याला वाटले वर्षाराणी मानेवस्तीवर गेली आहे का म्हणून माने वस्तीवर जाऊन त्याने चौकशी केली. परत येऊन आसपास चौफेर शैलेश ने पाहिले विहिरीत पाहिले तर तिचा म्रतदेह सापडला.
वर्षाराणी ही सिलेक कंट्रोल महापे (नवी मुंबई) येथे या ठिकाणी नोकरी करीत होती. पण आज तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बोरीवमध्ये हळहळ होत आहे. याची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात झाली असून आधिक तपास हवालदार एन बी डोंबे हे करीत आहेत.
बोरीव येथील युवती पाण्यात बुडून मृत्यू
RELATED ARTICLES